• Thu. Mar 19th, 2026
    आता मुंडेंसाठी मंत्रिपद सोडणार का? अडचणीच्या प्रश्नावर भुजबळ संतापले

    Chhagan Bhujbal : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, आणि धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी खात्यात झालेल्या कथित घोटाळ्याच्या आरोप यांमुळे धनंजय मुंडे यांना आपला मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंच्या जागी छगन भुजबळ यांना मंत्र पद देण्यात आलं आहे. पण आता कृषी घोटाळा प्रकरणात धनजंय मुंडे यांना क्लिनचीट मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी मंत्रिपद सोडणार का? असा प्रश्न विचारला असता भुजबळ संतापले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    आदित्य भवार, पुणे : अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाचा खातं मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांनी एका कार्यक्रमात वक्तव्य केलं होती की, धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळयालवर मी स्वतः ते खात सोडून देईन. याबाबत त्यांना आज प्रश्न विचारला असता छगन भुजबळ संतापले आणि प्रति सवाल केला, की त्यांना क्लीन चिट मिळाली आहे का? त्यांच्यावर जे आरोप झाले आहेत, ते सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्या प्रकरणात जे आरोपी आढळले म्हणून त्यांचे खाते काढून घेण्यात आलं होतं. पण आपली प्रकृती स्वस्त नसल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याची माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्विट करून दिली होती. त्यामुळे अजित पवारांच्या आमदारांमध्ये असलेला हा विरोधाभास भुजबळांच्या वक्तव्यामध्ये देखील पाहायला मिळाला.

    मंत्रिमंडळाची स्थापना झाली त्यावेळी छगन भुजबळ यांना मंत्रीपदापासून लांब ठेवण्यात आलं होतं. त्यावर छगन भुजबळ यांनी अनेकदा आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. “जहा नहीं चायना वहा नहीं रहना” हा त्यांचा एका चित्रपटाचा डायलॉग राज्यभर चर्चेत आला होता. त्यामुळे भुजबळांची नाराजी अजित पवारांची मोठे डोकेदुखी ठरली होती. ही नाराजी दूर करण्यात अजित पवार लवकरच यशस्वी ठरले. कारण धनंजय मुंडे यांना आपला आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला होता. नंतर धनंजय मुंडेंकडे असणारे अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद छगन भुजबळ यांना देण्यात आलं.

    मंत्रीमंडळाची स्थापना झाल्यापासून अजित पवार यांच्या आमदारांवर लागलेलं ग्रहण काय संपताना दिसत नाहीये. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून एकानंतर एक आमदार किंवा मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येत आहेत. सर्वप्रथम मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर छगन भुजबळ नाराज झाले होते, त्यानंतर धनंजय मुंडे यांचा निटवर्तीय वाल्मिक कराड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी म्हणून अढळला. त्यानंतर माणिकराव कोकाटे विधिमंडळात रम्मी खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला.

    दोन दिवसांपूर्वीच आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाने दौंड येथे गोळीबार केला. त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणी कुठेही थांबताना दिसत नाहीय. विशेष म्हणजे त्यांचेच आमदार किंवा मंत्री अजित पवारांच्या अडचणी वाढवत आहेत. दरम्यान येत्या काळात आणखीन नाही नवीन काही खुलासा समोर येत आहेत का? हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा