ACB Action in KDMC : केडीएमसीमध्ये एकाच दिवशी तीन अधिकाऱ्यांना ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे. केडीएमसीचे तीन अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. पालिकेचे घनकचरा विभागाचे अधिकारी वसंत देगलूकर, सुदर्शन जाधव लाचलुचपत विभागाकडून रंगेहात ताब्यात घेतले आहे. आजारी कर्मचाऱ्याला कामावर रुजू करण्यासाठी 25 हजार रुपयेची मागणी केली होती, दरम्यान 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने लाचखोर अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
केडीएमसीमध्ये एकाच दिवशी तीन अधिकाऱ्यांना ठाणे लाचलुचपत विभागाकडून रंगेहात अटक करण्यात आली आहे. पालिकेचे घनकचरा विभागाचे अधिकारी वसंत देवळूरकर, सुदर्शन जाधव यांना अटक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी आजारी कर्मचाऱ्याला कामावर रुजू करण्यासाठी 25 हजार रुपयांची मागणी केली होती. लाचलुचपत विभागाने 20 हजारांची लाच घेताना दोन्ही अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच केडीएमसीच्या सहाय्यक अभियंता रवींद्र आहिरे याला बांधकाम परवानगी देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडून 40 हजार रुपये लाज घेताना रंगेहात अटक करण्यात आली. आतापर्यंत केडीएमसीमधील 47 अधिकारी आणि कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरु लागली आहे. महापालिका निवडणुका झाल्यानंतर अधिकारी वर्गाचा भ्रष्टाचार आणि मनमानी कराभरावर लगाम बसेल, असं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी लालचलुचपत विभागाच्या कारवाईनंतर आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर भूमिका मांडली आहे. त्यांनी ‘जसे राज्यकर्ते तसे अधिकारी’, अशा शिर्षकाखाली निशाणा साधला आहे. “आज पुन्हा एकदा KDMC चे ३ भ्रष्ट अधिकारी एकाच दिवशी लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात सापडले. एकंदरीतच सुंपूर्ण KDMC मधील जनता या भ्रष्ट सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे फोफावलेल्या अनागोंदीच्या सापळ्यात अडकली आहे. परंतु याचे आमच्या शासनकर्त्यांना काहीच सोयरसुतक नाही. हे अनेकदा अधोरेखित झाले आहे. त्यांचे नेहमीचे एकच घोषवाक्य आहे , ‘अपना काम है बनता, भाड मे जाये जनता’ बरोबर ना?”, असा प्रश्न उपस्थिती केला आहे.

