Palghar Eco Car Accident: पालघरमध्ये मजुरी करुन घरी परतणाऱ्या तरुणींच्या इको कारला भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला तर सहा तरुणी जखमी झाल्या आहेत.
मजुरीचे काम करुन घरी जाताना अपघात
प्रवासी ईको कारमधून डहाणू तालुक्यातील तरुणी अच्छाड मजुरीचे काम उरकून डहाणू येथील आपल्या घराच्या दिशेने परतत होत्या. यावेळी उर्से – सारणी मार्गावर परतीचा प्रवास करत असताना रस्ता चिखलमय आणि खराब असल्याने इको कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेल्या कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला जोरदार धडक दिली. झाडाला धडकून ही इको कार उलटली आणि भीषण अपघात झाला.
Nalasopara Crime: भाऊ बेपत्ता, भावजयचाही पत्ता नाही; घरातील टाइल्सचा रंग वेगळा दिसला, खोदताच भयंकर घटनेचा उलगडा
नागरिकांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात नेलं
शनिवारी (19 जुलै) सायंकाळच्या सुमारास आंबिवली- सोमनपाडा परिसरात हा भीषण अपघात घडल्याची माहिती आहे. हा अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांनी जखमी तरुणींना तातडीने कासा येथील रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून एका तरुणीला मृत घोषित केलं.
अंजलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू
या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवास करणाऱ्या सात तरुणींपैकी अंजली रघुनाथ काकरा या तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. तर, जखमी झालेल्या सहा तरुणींपैकी दोन तरुणींवर प्राथमिक उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आहे. तर, उर्वरित चार तरुणींवर धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून मृत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ माजली असून अंजलीच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

