Dombivli Man Dies After Falling In Open Chamber: डोंबिवलीत एका व्यक्तीचा उघड्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या निष्काळीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे हे चेंबर नेमकं कोणी उघड ठेवलं, असा सवाल भाजपचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी उपस्थित केला. या संदर्भात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत एमआयडीसी प्रशासनाला देखील खडे बोल सुनावले आहेत.
कल्याण – शीळ रोडवरील टाटा नाका गांधीनगर परिसरामध्ये हे उघडे चेंबर होते. रविवारी या ठिकाणाहून बाबू धर्मा चव्हाण (वय वर्ष 60) चालत होते. यावेळी चव्हाण यांचा पाय घसरला आणि ते थेट बाजूलाच असलेल्या उघड्या चेंबरमध्ये पडले. एक इसम चेंबरमध्ये पडलाय हे आजूबाजूच्या नागरिकांनी पाहिलं. चव्हाण यांना तातडीने चेंबरच्या बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांनी हॉस्पिटल परिसरामध्ये गर्दी केली होती.
जमीन विकली, चार दिवस जेवायला दिलं नाही; मुलांच्या जाचाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी अन् मग…
निष्काळजीपणामुळे चव्हाण यांचा बळी गेला. आज आमचे वडील गेले उद्या कोणाच्या बाबतीत अशी घटना घडू नये आम्हाला न्याय पाहिजे अशी मागणी धर्मा चव्हाण यांच्या दोन्ही मुलांनी केली. हे चेंबर कायमच उघड असतं असा आरोप काशिनाथ चव्हाण आणि प्रवीण चव्हाण या त्यांच्या दोन्ही मुलांनी केला. या ठिकाणाहून अनेक गाड्या सुद्धा जात असतात उद्या कोणताही अनुचित प्रकार दुसऱ्याच्या घरी घडू नये अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. तर दुसरीकडे संतप्त नागरिकांनी आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका या ठिकाणी मांडली आहे.
Nalasopara Crime: भाऊ बेपत्ता, भावजयचाही पत्ता नाही; घरातील टाइल्सचा रंग वेगळा दिसला, खोदताच भयंकर घटनेचा उलगडा
आता एमआयडीसी प्रशासन यावर नेमकं काय प्रतिक्रिया देते नेमकं हे चेंबर कोणाच्या चुकीमुळे उघडं राहिलं याचा स्पष्टीकरण देण्यात येतं का ते देखील पाहावं लागेल. दरम्यान आता हें पाण्याच्या वॉलचं चेंबर तात्पुरते दुरुस्त करण्यात आले आहे, असे स्थानिकांनी सांगितले.

