मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.दरम्यान ११ पैकी ४ आरोपी हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. अमरावती मध्यवर्ती कारागृहातून सर्व आरोपींची सुटका करण्यात आलीये. आज जेलमधून सुटलेल्या आरोपी सुहैल मोहमूद शेखने प्रतिक्रिया दिली. २० वर्षांनंतर आम्ही जेलमधून सुटलो, देवावर आणि न्यायालयावर आमचा विश्वास या प्रकरणाशी आमचा काही संबंध नव्हता, पण तरी माझ्यावर आरोप केला गेला.