• Sat. Mar 7th, 2026
    बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढल्याची शंका, आता पर्यंत 13 जण ताब्यात

    Bangladeshi Immigrants News: नाशिकमध्ये ‘डंकी रूट’ने आलेल्या चार बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आतापर्यंत पकडलेल्या घुसखोरांची संख्या १३ झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात आणखी बांगलादेशी नागरिक असण्याची शक्यता आहे. यापूर्वी आडगाव आणि मुंबई नाका येथेही बांगलादेशी नागरिक सापडले होते. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

    म.टा. प्रतिनिधी, नाशिक : बांगलादेशातून ‘ डंकी रूट ‘ने कोलकाता आणि तेथून मुंबई व सुरतमार्गे नाशिकमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतल्याने घुसखोरांची आतापर्यंतची संख्या १३ झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात आणखी बांगलादेशी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये फेब्रुवारीपासून ही प्रकरणे उघड होत आहे.

    प्रकरण १ : ६ फेब्रुवारी २०२५ : आडगाव शिवारात एका बांधकाम साइटवर पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेशांतर करीत ६०० कामगारांच्या घोळक्यातून आठ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. संशयितांमध्ये सुमन गाझी (वय २७), अब्दुल्ला मंडल (२०), शाहीन मंडल (२३), लासेल शंतर (२३), आसाद मुल्ला (३०), आलीम मंडल (३२), अलअमीन शेख (२२), मोसीन मुल्ला (२२) यांचा समावेश आहे. संशयित सुमन गाझी बारा वर्षांपासून भारतात वास्तव्यास होता. त्याच्या संपर्कातून इतर संशयित भारतात आले. सर्वांनी नारायण गावातील एका आधार केंद्रावरून बनावट कागदपत्रे तयार केली होती. हे सर्व जण सध्या कारागृहात आहेत.
    Bangladesh Plane Crash: भीषण दुर्घटना! हवाई दलाचं विमान शाळेवर कोसळलं; आसमंतात धुराचे लोट, एकाचा मृत्यू
    प्रकरण २ : ११ जून २०२५ : सोशल मीडियावर जुळलेल्या प्रेमासाठी बांगलादेशातून छुप्या मार्गाने भारतात प्रवेश करून मुंबई व नाशिक गाठणाऱ्या तरुणीसह तिच्या नाशिकमधील प्रियकराविरुद्ध मुंबई नाका पोलिसांत गुन्हा नोंद झाला. सुरैया अक्तर उर्फ श्रेया केदारे (वय २८, रा. गोविंदनगर, मूळ रा. जेस्सोर, बांगलादेश) व गोविंद नंदू केदारे (रा. अनमोल रेसेडेन्सी, गोविंदनगर, मूळ रा. लासलगाव) अशी संशयितांची नावे आहेत. सुरैया हिने पाच-सहा वेळा अनधिकृतरित्या बांगलादेशातून भारतात प्रवेश केला असून, त्यासाठी तिने अनुक्रमे पाच, आठ, दहा, बारा व अठरा हजार खर्च केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

    प्रकरण ३ : २० जुलै २०२५ : गुन्हे शाखा युनिट एक आणि अंबड पोलिसांनी संयुक्तरित्या पंचवटी पोलिसांच्या हद्दीत अमृतधाम परिसरातील खैरे मळ्यात धाड टाकली. त्या वेळी माईशा हाबिब शेख (वय २२), निशान मिहीर शेख (२१), झुमूर हसन शेख (३३) व रिहाना जलील गाझी (३०) या चार महिलांसह नवजीत भवन दास (३८, रा. अमृतधाम) या संशयितांना ताब्यात घेतले. नवजीत याने चारही महिलांना खोलीत वास्तव्यास परवानगी दिली. यासह संशयित जगदीश मिस्तरी (रा. सूतर) व दोन बांगलादेशी व्यक्तींनी चौघींना नाशिकमध्ये पोहोचविले.

    Chhagan Bhujbal यांचं खासदारकीच्या प्रश्नावर मिश्किल उत्तर, काय म्हणाले पाहा?

    अंबड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रताप गिरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांना कळविले. उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या आदेशान्वये महिला उपनिरीक्षक सविता उंडे, चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, श्रेणी उपनिरीक्षक किरण शिरसाठ यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.