Savarkar Defamation Case: स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याचा गुन्हा नाकबूल असल्याचे गांधी यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे आता या दाव्याच्या सुनावणीला प्रारंभ होणार आहे.
लोकप्रतिनिधींवर दाखल दाव्यांची सुनावणी घेणाऱ्या पुण्यातील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अमोल शिंदे यांच्यासमोर ही याचिका नोंदविण्यात (प्ली रेकॉर्डिंग) आली. राहुल गांधी यांनी मार्च २०२३मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात एप्रिल २०२३मध्ये मानहानीची याचिका दाखल केली आहे. विशेष न्यायालयाने ही याचिका नोंदविताना राहुल गांधी यांच्यावरील आरोप वाचून दाखवित ‘गुन्हा कबूल आहे का,’ अशी विचारणा केली. राहुल गांधी प्रत्यक्ष न्यायालयात हजर नसल्याने त्यांची बाजू मांडणारे ॲड. मिलिंद पवार यांनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितले.
Shani Shingnapur Temple: शनि शिंगणापूरमध्ये 2474 बोगस कर्मचारी; फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
‘सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या आधारे विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना या दाव्याच्या सुनावणीला वैयक्तिक हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट दिली असून, त्यांच्या वतीने याचिका नोंदविण्यास परवानगी दिली. त्यानंतर न्यायालयाने तक्रार प्रत व त्या संदर्भातील कागदपत्रे मिळाल्याबाबत विचारणा केली; तसेच आरोप वाचून दाखवित ‘गुन्हा कबूल आहे का,’ अशी विचारणा केली. त्यावर, ‘राहुल गांधी यांच्या वतीने गुन्हा कबूल नसल्याचे सांगितले,’ अशी माहिती ॲड. मिलिंद पवार यांनी दिली.
Buldhana News: आदिवासी आश्रमशाळेतील 13 मुलींना विषबाधा; कढी-भात खाल्ल्यानंतर सुरु झाला त्रास, उपचार सुरु
सात्यकी सावरकर यांची बाजू मांडणारे ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी आरोपीची याचिका नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले. ‘या प्रकरणी जानेवारीपासून पाठपुरावा सुरू होता. आता पुढील तारखेपासून फौजदारी प्रकरणाची सुनावणी सुरू होणार असून, दोन्ही पक्षांना साक्षी-पुरावे मांडून उलटतपासणीची संधी मिळणार आहे,’ असे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार, हे प्रकरण जलदगतीने चालविण्यासाठी कोणतीही दिरंगाई करू नका, अशा सूचनाही न्यायालयाने दोन्ही पक्षांना दिल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी आता २९ जुलैला सुनावणी होणार आहे.
Devendra Fadnavis: राज्यात 3367 धार्मिक स्थळे भोंगेमुक्त; विधानसभेत मुख्यमंत्र्यांचा दावा, नवीन भोंगे आढळल्यास…
काय आहे प्रकरण?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटन दौऱ्यात पाच मार्च २०२३मध्ये ‘ओव्हरसीज काँग्रेस’च्या मेळाव्यात भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या मित्रांसमवेत एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केल्याने आनंद झाल्याचे एका पुस्तकात लिहिल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता. त्यावर हे विधान खोटे आणि अवमानकारक असल्याची तक्रार सात्यकी सावरकर यांनी केली आहे.

