• Wed. Jun 10th, 2026

    Mumbai Dam Water Level: मुंबईकरांना पाणीदिलासा! सातही धरणांत ५० टक्क्यांहून अधिक भर, कोणत्या धरणात किती पाणी?

    Mumbai Dam Water Level: मुंबईकरांना पाणीदिलासा! सातही धरणांत ५० टक्क्यांहून अधिक भर, कोणत्या धरणात किती पाणी?

    Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा धरणांतून होतो.

    vaitarna dam (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणक्षेत्रांत पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठा ५० टक्के झाला आहे. सात धरणांपैकी तीन धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पाणीसाठा जास्त आहे.

    मुंबईला पाणीपुरवठा मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा धरणांतून होतो. १६ जून २०२५ला धरणातील पाणीसाठा ८.६० टक्के झाला होता आणि त्याच दिवसापासून पाण्याची गरज भागवण्यासाठी मुंबईकरांसाठी राखीव पाणीसाठा वापरण्यास महापालिकेने सुरुवात केली. त्यानंतर धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाला आणि २० जूनला हाच पाणीसाठा २५ टक्केपर्यंत पोहोचला. त्यानंतरही धरणक्षेत्रात पाऊस सुरूच आहे. चार जुलैपर्यंत सात धरणांतील पाणीसाठा ५०.७५ टक्के झाला आहे. सातही धरणांची साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ६३ दशलक्ष लिटर असून आता सात लाख ३४ हजार ५६२ दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे. मोडकसागर, मध्य वैतरणा, भातसा या धरणक्षेत्रात चांगलाच पाऊस पडत आहे.
    Chandrakant Patil: पुणे ‘मिसिंग लिंक’वरुन भडकले चंद्रकांत पाटील; म्हणाले, भुतासारखा मागे लागेन…
    या पावसामुळे यंदा धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत पाणीसाठा ८.५९ टक्के आणि २०२३ मध्ये १७.६६ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा मोठी वाढ आहे.

    राखीव साठा वापरणे बंद
    राज्य सरकारच्या अखत्यारितील अप्पर वैतरणा धरणातून राखीव कोट्यातील ६८ हजार दशलक्ष लिटर पाणी आणि भातसातून एक लाख १३ हजार दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करण्याची मंजुरी मिळाली होती. त्यापैकी फक्त अप्पर वैतरणातील पाणीसाठा वापरण्यास सुरुवात केली. मात्र धरणातील पाणीसाठा वाढल्याने राखीव साठा वापरणे बंद करण्यात आले आहे.
    राज्यात दोन महिन्यांत 479 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; विदर्भ, मराठवाड्यात चिंताजनक स्थिती, काय सांगते आकडेवारी?
    सात धरणातील पाणीसाठा (टक्केवारीत)

    अप्पर वैतरणा —–६६.३८
    मोडक सागर —–६३.१७
    तानसा —–४८.८५
    मध्य वैतरणा —–५९
    भातसा —–४२.१३
    विहार —–४३.०८
    तुळशी —–४०.३२

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा