• Fri. Mar 13th, 2026
    हातावर मेहंदी, हिरवा चुडा अन् गळ्यात मंगळसूत्र, अवघ्या दिड महिन्याचा संसार आणि आक्रित घडलं

    Married Women Ends Life : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडमध्ये एक दुखद घटना समोर आलीआहे. नवविवाहित गीता शिंदे हिने लग्नाच्या दीड महिन्यातच आत्महत्या केली. ती २३ वर्षांची होती.

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: कन्नड तालुक्यातील हतनूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका २३ वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केली. गीता शेखर शिंदे असे तिचे नाव आहे. लग्नाच्या दीड महिन्यातच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याने गावात खळबळ माजली आहे. तिने साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

    Navi Mumbai : धक्कादायक! सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये 15 दिवसांच्या बाळाला सोडून आई फरार, काय म्हणाले पोलिस? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीताचा विवाह १७ मे रोजी रामपूर वाडी येथील शेखर शिंदे यांच्याशी झाला होता. काही दिवसांपूर्वी ती माहेरी हतनूरलाआली होती. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास तिने घरात गळफास घेतला. नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले.

    गावकऱ्यांनी सांगितले की, रामू विठ्ठल तुपे यांची गीता मुलगी आहे. पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी तिला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. “गीताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला आहे,” असे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

    Mumbai Crime : ३१ व्या मजल्यावरुन पडलेल्या मुलीच्या मृत्यूला धक्कादायक वळण, अल्पवयीन मित्रानेच तिला ढकललं; बनाव रचला पण शेवटी फसला गीताने आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकलेले नाही. “तिला सासरचा त्रास होता का? की इतर कुठल्या कारणामुळे गीताने आत्महत्या केली? हे अद्याप कळू शकले नाही,” असे पोलीस म्हणाले. तिच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. पोलीस सर्व शक्यतांचा तपास करत आहेत. तिच्या कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

    गृहकलहाची बाब कोर्टात समोर आलीच नाही; डॉ. वळसंगकर प्रकरणात महिलेच्या वकिलांची नवी माहिती

    राज्यात विवाहितांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या आत्महत्यांमागे बरीच कारणं असू शकतात. परंतु इतकं टोकाचं पाऊल उचलण्यामागे पीडितांची काय मानसिकता असेल याचे कारण शोधणे महत्तावाचे आहे. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याआधी पीडितांनी जवळच्या एखाद्या व्यक्तीसोबत आपल्या समस्या मांडाव्यात आणि मधला मार्ग शोधून काढावा. समस्या, अडचणी प्रत्येकालाच असतात. पण आत्महत्या करुन त्यांपासून स्वतःची सुटका करुन घेणे हा त्यावरचा उपाय नाही. कुटुंबातील व्यक्तींनीही पीडित व्यक्तीच्या अडचणी आणि त्रास समजून घेणे आवश्यक आहे. कारण नंतर पश्चाताप करण्यापेक्षा जेव्हा आपली व्यक्ती आपल्या सोबत असते, त्याचवेळी तिचा त्रास समजून घेणं महत्त्वाचं असतं, असं तज्ञांचं मत आहे.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा