Nashik Onion: अवघ्या एक ते दीड हजार रुपये प्रति क्विंटल दराने उत्पादकांची बोळवण होत असल्याने, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
निर्यातीवर सरकारने दीर्घकाळ लादलेले निर्यातशुल्क, भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती आणि आता पाठोपाठ बांगलादेशने अघोषितपणे थांबविलेली कांद्याची आयात, या कारणांच्या परिणामस्वरूप स्थानिक बाजारपेठेत कांद्याचा उत्पादन खर्चदेखील वसून होईनासा झाला आहे. अवघ्या एक ते दीड हजार रुपये प्रति क्विंटल दराने उत्पादकांची बोळवण होत असल्याने, शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
एकीकडे रब्बी हंगामात कांद्याचे मोठे उत्पादन झाले. सद्यस्थितीत बांगलादेशला कांद्याची निर्यात सुमारे २५ ते ३० टक्के होत होती. बांगलादेशच्या बरोबरीने दुबई, मलेशिया, श्रीलंका या देशांनाही कांद्याचा मोठा पुरवठा भारताकडून होतो. यात सर्वाधिक पुरवठा बांगलादेशला केला जातो. विशेषत: नाशिक जिल्ह्यातून यात निर्यात होणाऱ्या कांद्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, बांगलादेशची सीमा सध्या कांद्यासाठी बंद झाल्याने देशाच्या परकीय चलनाला फटका बसण्यासोबतच स्थानिक उत्पादकांचा कांदा उत्पादनाचा खर्चदेखील निघेनासा झाला आहे.
Chhagan Bhujbal: जनतेला वाटतंय ठाकरे बंधू एकत्र यावेत, पण…, नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
दरम्यान, शनिवारी लासलगाव बाजार समितीमध्ये सात हजार ५०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. या कांद्याला किमान ६००, तर सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. यातून कांद्याचा उत्पादन खर्चही वसुल होत नसल्याने नाराजी आहे.
Satbara Utara: 7/12 संदर्भात मोठी अपडेट, 1 ऑगस्टपासून ऑफलाइन सुविधा बंद, असा करावा लागेल अर्ज
अवकाळीचाही फटका
जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळेदेखील कांद्याला मोठा फटका बसला होता. हजारो हेक्टरवरील कांदा पीक हातचे गेल्याने तो ही मोठा आर्थिक फटका उत्पादकांना बसला. आता निर्यातशुल्क हटविल्यानंतर कांद्याला सुगीचे दिवस येणे अपेक्षित असतानाच बांगलादेशच्या धोरणांमुळे पुन्हा एकदा कांदा उत्पादकांची कोंडी होते आहे. दुसरीकडे सरकारी खरेदी प्रक्रियाही मंद आहे. केंद्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रश्नी हस्तक्षेप करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

