Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भरत गोगावले यांनी नारायण राणेंबाबत मोठे विधान केले आहे. अंगावर केसी घेतल्या, मर्डर, भानगडी झाल्या प्रसंगी जेल भोगलं, भानगडी करा असं सांगत नाही पण आपल्याला आता जुळवून चालायचं असल्याचं गोगावले म्हणाले.
गोगावले पुढे म्हणाले की, काही वेळा मागेपुढे होईल वाईटपणा घ्यायला लागला तरी चालेल आम्ही ज्याला तिकीट देऊ त्याला निवडून आणायचा प्रयत्न करा तुम्ही जर का कोणी कुणाला पाडायचा प्रयत्न केला तर तुमचा जय महाराष्ट्र झाला म्हणून समजा असा सज्ज इशारा मंत्री भरत गोगावले यांनी सिंधुदुर्ग येथील शिवसेना कार्यकर्त्यांचे मेळाव्यात बोलताना दिला आहे.महायुतीमधील कोणी या प्रयत्न केल्यास खपवून घेणार नाही असाच सूचक इशारा मंत्री भरत गोगावले यांनी दिला आहे.
Uday Samant : ‘…तुम्ही सांगितलं तर स्वबळावरदेखील लढू’; मंत्री उदय सामंत यांचं मोठं विधान
आम्ही राजकारणातील जुनी मंडळी आहोत आम्ही वडापाव खाऊन देखील काम केलं आहे. मात्र आता राजकारण बदलल आहे कोणाला बिर्याणी लागते पण त्याबद्दल काही नाही सोबत तर वाढली आहे. आम्ही काही कमजोर आहोत, अशातला भाग नाही. पण जो प्रामाणिक काम करेल त्याचाच विचार होईल. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं केसरकर साहेब असतील सामंत साहेब असतील विचारा केसरकर साहेबांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका शब्दावर या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अडीच वर्षे मंत्रीपद सोडणारा हा तुमचा आमदार तुमच्यासमोर उभा आहे. लक्षात ठेवा हल्ली कोणी ग्रामपंचायतीचे सदस्य पद हे सोडत नाही. आम्ही अडून बसलो असतो कारण पहिल्या फळीमध्ये आम्ही होतो पण केवळ आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सावंत साहेबांनी आम्हाला विचारलं तेव्हा आम्ही तात्काळ सांगितलं साहेब तुम्हाला अडचणीत असेल तर आम्ही थांबतो. हे एका क्षणात आपण सांगितलं असं सांगतं निष्ठा काय असते याचेच धडे त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्याचं गोगावले म्हणाले.
Bharat Gogavale : ‘नारायण राणे यांनी मर्डर अन् भानगडी केल्यात’; निलेश राणेंसमोरच भरतशेठ बोलता-बोलता भलतंच बोलून गेले
जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका आहेत तर या वेळेला थोडं थोडं मागेपुढे करायला हरकत नाही या वेळेला आम्हाला पहिल्यांदी मंत्रिपद दिले गेले पण आपण कधीही नाराज झालो नाही बोललो नाही. आम्ही आमचं काम करत राहिलो आणि त्याच कामाची पोचपावती म्हणून मला जनतेने चौथ्यांदा निवडून दिलं आणि तेही चढत्या क्रमाने. अशा शब्दात शिवसेना कार्यकर्त्यांना त्यांनी संघटनेच्या काम करत असताना निवडणुकीत एकत्रितरित्या पक्षासाठी निष्ठेने काम करा पक्षाकडून तिकीट मिळेल त्याला निवडून आणा असाच सल्ला दिला. मंडळी आम्ही गरिबांचे शेठ आहोत आम्ही श्रीमंतांचे शेठ नाही आहोत, त्यामुळे आम्ही नेहमी लोकांना सांगतो की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागते. गरिबांच्या आशीर्वाद आई-वडिलांची पुण्याई आणि गणपतीचे स्तोत्र म्हटल्याशिवाय आम्ही घराबाहेर पडत नाही, असंही गोगावलेंनी म्हटलं आहे.
कोल्हापुरातील तरुणाचा रुमालाने केला घात, आंबोलीत थेट 300 फूट खोल दरीत कोसळला, नेमकं काय घडलं?
पालकमंत्री ही आम्ही होऊ त्याची पण काळजी करण्याचे कारण नाही जर आम्ही काम करतोय तर त्याचा मोबदला मागतो जो काम करत नाही त्याला मोबदला मागण्याचा अधिकार नाही आम्ही नेहमी सांगतो एखादी चूक झाली तर चार वेळा माफी मागितली तर तो पुढे जाईल पण आमची पद्धत आहे चुकला तर माफी मागू पण आम्ही जोपर्यंत चुकत नाय तोपर्यंत झुकत पण नाय हा आमचा बाणा आहे बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे असं सांगत पालकमंत्री पदाच्या विषयावरून त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सूचक इशारा दिला आहे.

