• Sun. Mar 8th, 2026

    कोल्हापुरात ठाकरेसेनेत वाद उफाळला, खंजीर खुपसणाऱ्यासोबत काम करणार नाही; शहरप्रमुखाची भूमिका

    कोल्हापुरात ठाकरेसेनेत वाद उफाळला, खंजीर खुपसणाऱ्यासोबत काम करणार नाही; शहरप्रमुखाची भूमिका

    कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीतील आलेल्या पराभवानंतर काही बदल करण्यात आले. जिल्हाप्रमुखाची निवड करण्यात आली. मात्र, या निवडीमुळे पक्षात नाराजी पसरली असून अंतर्गत वाद उफाळून आले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    नयन यादवाड, कोल्हापूर : राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कोल्हापूर जिल्ह्यात पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी माजी नगरसेवक रविकिरण इंगवले तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा शहर प्रमुख पदी हर्षल सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे. मात्र जिल्हाप्रमुख पदी इंगवले यांची निवडीनंतर आता कोल्हापुरात ठाकरे गटात नवी ऊर्जा निर्माण होण्याऐवजी उलट नाराजी नाट्यच सुरू झाल असून अंतर्गत वाद उफाळून आला आहे.

    जिल्हाप्रमुख पदावरून वाद
    शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याकडे दोन पदे होती. त्यामुळे गेले काही दिवस जिल्हाप्रमुख बदलाच्या हालचाली सुरू होत्या. जिल्हाप्रमख पदाच्या रेस मध्ये शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह शहर समन्वयक हर्षल सुर्वे व उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे हे इच्छुक होते. सर्वच इच्छुकांनी वरिष्ठांकडे जोरदार सेटिंग ही लावली होती. काल शुक्रवारी मातोश्री वरून अखेर रविकिरण इंगवले यांना पक्षश्रेष्ठींनी संधी देत त्यांना जिल्हाप्रमुख केल. इंगवले यांच्याकडे कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली तर निवडीनंतर इंगवले यांनी पूर्वी जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार आणि सहा आमदार होते. तशीच शिवसेनेची पुन्हा ताकद निर्माण करू. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका ताकदीने लढवू अशी प्रतिक्रिया दिली त्याच्या निवडीमुळे इंगवले गटात आनंदी वातावरण असल तरी उर्वरीत ठाकरे गटात नाराजी सुरू झाली आहे…

    पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीला जिल्हाप्रमुख केलय

    जिल्हाप्रमुखपदी रविकरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. त्यांच्या निवडीनंतर हर्षल सुर्वे यांनी तीव्र नाराजी दर्शवली असून इंगवले यांच्या नेतृत्वात काम करण्यास हर्षल सुर्वे यांनी नकार दिला आहे. जवळच्या कार्यकर्त्याचा आणि सहकाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीला जिल्हाप्रमुख करण्यात आलेलं आहे. अश्या व्यक्ती सोबत मला काम करायचं नाही. इंगवले सगळ्या पक्षात फिरून आले ते सगळ्या नेत्यांच्या जवळ आहेत. ते ज्यांच्याजवळ गेले त्यांच्यावर ते उलटले राजेश क्षीरसागर, संजय पवार, सतेज पाटील यांच्यासह अनेक नेत्याना याचा अनुभव आला आहे. आता त्यांना सगळ्यांनी नाकारलं आणि अशांना आमच्या उरावर आणून बसवण्यात आल आहे अस बोलत इंगवलेयांच्या निवडीवर नाराजी दर्शवली आहे.

    एका रात्रीत अस काय झाल की नाव बदलण्यात आल ?
    तसेच जिल्हाप्रमुख पदासाठी जवळपास माझ नाव निश्चित झाल्याच वरिष्ठांकडून सांगण्यात आल होत. शिवसेना वाड्यावस्त्यावर पोहोचवण्याच काम आम्ही केलं आहे आणि या निष्ठेच फळ मला मिळेल अस वाटत होत. मात्र अचानक एका रात्रीत अस काय झाल की नाव बदलण्यात आल असा सवाल हर्षल सुर्वे यांनी विचारला आहे. तर या संदर्भात वरिष्ठांसोबत आमची चर्चा झाली असून आमची नाराजी दर्शवली असून वरिष्ठांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट घालून देऊ तुम्ही तुमच्या अडचणी त्यांच्यासमोर सांगत त्यावर उद्धव ठाकरे निर्णय घेतील असा शब्द दिला असल्याच सुर्वे यांनी म्हटलं आहे. कोणाच्याही संपर्कात नसलेल्या माणसाला जिल्हाप्रमुख करण्यात आल आहे. हा कोल्हापूरचा जिल्हाप्रमुख नसून एखाद्या टोळीचा प्रमुख आहे या जिल्हाप्रमुख मुळे तळागाळात पोचवलेली शिवसेना केवळ गांधी मैदानपुरती राहील या पदाला भव्यरूप यायच असेल तर हा निर्णय बदलायला हवा आणि निष्ठावंत शिवसैनिकाला संधी द्यायला हवी असे ही सुर्वे म्हणाले आहेत.

    संजय पवार देखील आपली भूमिका जाहीर करणार
    गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटातील वाद चांगलाच चर्चेत आहे. यापूर्वी शिवसेना उपनेते संजय पवार आणि रविकिरण इंगवले यांच्यामधील सुद्धा वादाने टोक गाठले होते. तर आता हर्षल सुर्वे आणि रविकिरण इंगवले यांच्यासोबत वाद उफाळला असून सुर्वे यांच्यासह अनेक शिवसैनिक नाराजी दर्शवत आहेत सोमवारी उपनेते संजय पवार देखील आपली भूमिका जाहीर करणार असून ते देखील या निवडीने नाराज आहेत. सध्या कोल्हापुरात शिवसेनेची मशाल पेटण्याची ऐवजी शिवसैनिकातील वादच चांगला पेटला आहे.यावर आता ठाकरे काय निर्णय घेणार आणि कसा हा वाद मिटवणार हे पाहणं औत्सुक्याच असणार आहे..

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा