Maharashtra Politics :मराठी भाषेच्या संदर्भात आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसंदर्भात दोन्ही नेते एकत्र येऊन दौरा (मोर्चा) काढत असतील, तर त्याचा एक चांगला परिणाम दिसून येईल, असं अमोल मिटकरी म्हणाले
अमोल मिटकरी काय म्हणाले?
मराठी भाषेच्या संदर्भात आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसंदर्भात दोन्ही नेते एकत्र येऊन दौरा (मोर्चा) काढत असतील, तर त्याचा एक चांगला परिणाम दिसून येईल, असं मला वाटतं. शेवटी मराठी आपली भाषा आहे, आपली अस्मिता आहे. दोघांनीही पक्षविरहित मोर्चा काढण्यासाठी एकत्र येऊन हा निर्णय घेतला असेल, तर त्या निर्णयाचं मी स्वागत करतो, असं अमोल मिटकरी म्हणाले.पाच किंवा सहा तारखेला ठाकरे बंधूंचा मोर्चा ठरत आहे. जर त्या दिवशी विधिमंडळाचं कामकाज नसेल, तर मी त्या दिवशी मोर्चामध्ये सहभागी होईन, असं अमोल मिटकरी यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं.
Uddhav Raj Thackeray Re-Union : ठाकरे बंधू एकत्र, प्रकाश महाजनांना अत्यानंद, म्हणाले आता ‘त्यांना’ बर्नॉल पाठवेन म्हणतोय!
पुढील शनिवार, पाच जुलै रोजी हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा निघणार आहे. याची वेळ आणि ठिकाण हे दोन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून ठरवणार आहेत.
Maharahstra Politics : हिंदीसक्ती विरोधात भाजपमध्ये नाराजी? पहिला राजीनामा पडला, मनसेचा दावा, राज ठाकरेंना पाठिंबा
राज ठाकरेंकडून काल घोषणा
गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या 5 जुलैच्या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात उद्धव ठाकरेंना बोलवणार का? याबाबत राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांत तेही आलेच ना असा प्रतिप्रश्न करत, त्यांच्याशीही मी बोलणार आहे.
Uddhav Raj Union : ठाकरे बंधूंच्या मोर्चाला सत्ताधारी पक्षातून पहिला पाठिंबा, अजितदादांचा आमदार सहभागी होणार
माझी माणसे त्यांच्या माणसांशी बोलतील. मी आधीच स्पष्ट केले होते, की कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हे माझे पहिले वाक्य होते ते तुम्हाला येत्या 5 तारखेला कळेल असेही ते म्हणाले होते.

