• Tue. Mar 10th, 2026
    राज्य सरकारचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर; वैशंपायन, कलगुटकर यांच्यासह ‘मटा’च्या सहा जणांचा गौरव

    State Govt Journalism Award: राज्य सरकारच्यावतीने दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. त्यानुसार सरकारने सन २०१९, २०२०, २०२१, २०२२ आणि २०२३ या पाच वर्षांचे विविध पुरस्कार बुधवारी जाहीर केले.

    mata award (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्य सरकारतर्फे पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा बुधवारी करण्यात आली. त्यात महाराष्ट्र टाइम्सचे नवी दिल्लीचे विशेष प्रतिनिधी मंगेश वैशंपायन यांना सन २०२१ साठीचा अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

    यांना मिळणार पुरस्कार…
    महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीच्या विशेष प्रतिनिधी शर्मिला कलगुटकर यांना सन २०२२ चा मुंबई विभागासाठी आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय ‘महाराष्ट्र टाइम्स’चे नागपूर आवृत्तीचे विशेष प्रतिनिधी प्रवीण लोणकर, नाशिक आवृत्तीचे खास प्रतिनिधी फणिंद्र मंडलिक, वार्ताहर खेमेंद्र कटरे आणि ठाण्याचे वार्ताहर जान्हवी पाटील यांनाही विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत.
    Devendra Fadnavis: दुष्काळी भागाचे चित्र बदलेल; शक्तिपीठ महामार्गाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण
    उत्कृष्ट कामगिरीचा गौरव
    राज्य सरकारच्यावतीने दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. त्यानुसार सरकारने सन २०१९, २०२०, २०२१, २०२२ आणि २०२३ या पाच वर्षांचे विविध पुरस्कार बुधवारी जाहीर केले. यावेळी या पाचही वर्षासाठी राज्य सरकारने लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्काराचीही घोषणा केली. यामध्ये सन २०१९-राही भिडे, २०२०-सुधीर पाठक, २०२१-भाऊ तोरसेकर, २०२२-विजय बाविस्कर, दै.लोकमत आणि २०२३ – बाळासाहेब जाधव, दै. पुढारी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
    Nashik Politics: कुटुंब एक शिवसेना दोन, एक बंधू ठाकरे गटात, आता दुसरा भाऊ शिंदेंच्या वाटेवर?
    राज्य सरकारने जाहीर केलेल्या या पुरस्काराच्या यादीत ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या एकूण सहा प्रतिनिधींचा समावेश आहे. त्यामध्ये नवी दिल्लीचे विशेष प्रतिनिधी मंगेश वैशंपायन सन २०२१ साठी अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार , मुंबई आवृत्तीच्या विशेष प्रतिनिधी शर्मिला कलगुटकर यांना सन २०२२ चा मुंबई विभागासाठी आचार्य अत्रे पुरस्कार , नाशिक आवृत्तीचे फणिंद्र मंडलिक यांना नाशिक विभागासाठी दिला जाणारा सन २०२१ चा दादासाहेब पोतनीस पुरस्कार , ठाण्याच्या वार्ताहर जान्हवी पाटील यांना कोकण विभागासाठी दिला जाणारा सन २०२१ साठीचा शि. म. परांजपे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सन २०२२ साठी स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कारासाठी नागपूरचे प्रवीण लोणकर यांची निवड करण्यात आली आहे. गोंदियाचे वार्ताहर खेमेंद्र कटरे यांना २०२२ साठीचा नागपूर विभागासाठी दिला जाणारा ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed