मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आव्हान दिले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना, तुम्ही अंतरवालीत या, आम्ही समोरासमोर मराठा समाजासमोर सत्य मांडतो,असे आव्हान जरांगेंनी दिले. शिवाय 58 लाख कुणबी नोंदी कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विखे पाटील यांच्यावर केला.