Raju Shetty News : भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्या शेतकर्यांबाबतच्या एका वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ‘तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनी दिले,’ असे विधान त्यांनी केले, ज्यामुळे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
मोदींनी महाराष्ट्राला दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिल्या-
शेतकरी नेते राजू शेट्टी कोल्हापूरहुन तुळजापूरकडे जाताना काही वेळ सोलापुरात होते. यावेळी माध्यमांसमोर बोलताना राजू शेट्टींनी बबनराव लोणीकरांच्या वादग्रस्त विधानाला उत्तर दिले आहे. मोदींनी महाराष्ट्र राज्याला दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिल्या, असल्याचा थेट टोला राजू शेट्टी यांनी केला. मोदींच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
गॅसचं रेग्युलेटर काढताना भडका, सिलेंडरच्या स्फोटात दोन चिमुकल्यांचा हृदयद्रावक अंत, चौघे जखमी, मंगळवेढा हादरलंमोदींनी शेतकऱ्यांना काय दिलं हे सांगण्या अगोदर मोदींनी शेतकऱ्यांना काय दिलं याचा हिशोब आमच्याकडे तयार आहे. मी बबनराव लोणीकर यांच्या गावात जायला तयार आहे, मोदींनी शेतकऱ्यांचे काय काय हिसकावून घेतले. याबाबत बोलायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे. थेट मोदींवर राजू शेट्टी यांनी टीका केला.
बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका ही केली जातंय. बबनराव लोणीकरांनी केलेल्या विधानावर आज देवेंद्र फडणवीस यांनीही बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानावर भाष्य केले. बबनराव लोणीकरांनी केलेल्या विधानावर आतापर्यंत अनेकांनी टीका केली. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच गोंधळ उडाल्याचे दिसतंय.

