• Tue. Jun 30th, 2026

    संजय राऊतांच्या अटकेमागे वेगळंच कारण? शरद पवारांनी सांगितलं 58 कोटींचं ‘ते’ प्रकरण

    ByMH LIVE NEWS

    May 17, 2025
    संजय राऊतांच्या अटकेमागे वेगळंच कारण? शरद पवारांनी सांगितलं 58 कोटींचं ‘ते’ प्रकरण

    Sharad Pawar on Sanjay Raut – शिवसेना नेते,खासदार संजय राऊत यांना 2022 मध्ये पत्राचाळ प्रकरणावरुन अटक करण्यात आली होती. आज तरुंगवासाच्या अनुभवावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी शरद पवार यांनी अटकेचे वेगळेच कारण सांगितले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग हे तुरुंगवासातील अनुभवावर आधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडत आहे. त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या अटकेसंबधी मोठा खुलासा केला आहे. पत्राचाळ प्रकरण हे निमित्त होते मात्र यासंबंधीचे वेगळे कारण त्यांनी सांगितले आहे.

    शरद पवारांनी सांगितले अटकेचे कारण काय?
    कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, संजय राऊतांनी जे 100 दिवस आर्थर रोड जेलमध्ये घालवले.ते लिखित स्वरुपात आपल्या समोर मांडले. कुणी गुन्हा केला आहे. केस झाली असेल. त्याचा निकाल लागला असेल तर असे संकट लोकांवर येते. त्यांना अटक करतात. संजय राऊतांनी काय केले होते. राऊत सामनात रोखठोक भूमिका मांडतात. त्यांची लेखणी काही लोकांना पटत नव्हती. ते अस्वस्थ होते. ते संधींची वाट पाहत होते. पत्राचाळ प्रकरणाने त्यांना संधी दिली.

    ते पुढे म्हणाले, पत्राचाळीत कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहत होते. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यांना घर मिळावी अशाप्रकारची मागणी त्यांच्याकडून होती. ते संजय राऊतांकडे पोहचले. त्याच्यामुळे संधी मिळाली त्यांच्या नेहमीच्या लिखाणाने दुखावले गेले होते अशा शासकीय यंत्रणेला. ईडीचे योगदान या प्रकरणात अधिक आहे. संजय राऊतांचा यांचा यथकिंचतही संबंध नसताना त्यांना गुतंवले.

    58 कोटींची रक्कमजिथे अन्याय होतो. अत्याचार आहे. त्याच्याविरुद्ध संजय राऊत हे अखंडपणाने काम करत होते. शासकीय यंत्रणमध्ये जिथे भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराविरुद्ध ते नेहमीच लिहितात. मुंबई महाराष्ट्रात काही लोक चुकीचं काम करतात हे माहित असताना त्यांच्यासंबंधीची कारवाई होत नव्हती. खासदार म्हणून राऊतांनी देशाच्या प्रमुखांना यासंबंधीचे पत्र लिहिले. जे लोक शासकीय यंत्रणेशी भ्रष्टाचाराच्या मार्गाने संबंध ठेवातात अशा लोकांच्या मार्फत पैसे कसे गोळा केले जातात याचे सविस्तर लिखाण त्यांनी केंद्र सरकारला कळवले. त्यात 30 ते 35 लोक, कंपन्या होत्या. त्यांच्याकडून पैसे काढले गेले. ती रक्कम 58 कोटी पर्यंत होती. संजय राऊतांच्याकडे ही माहिती आल्यानंतर त्यांनी देशांच्या प्रमुख लोकांना ही माहिती लिखित स्वरुपात लिहिली. त्याचा परिणाम एकच झाला कारवाई झाली नाही.पण त्यांना अटक केली. आणि 100 दिवस त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed