• Sun. Mar 8th, 2026

    बालवाङ्मय वाचायचं माझं वय नाही! राऊतांच्या पुस्तकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला

    बालवाङ्मय वाचायचं माझं वय नाही! राऊतांच्या पुस्तकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला

    Devendra Fadnavis On Sanjay Raut Book: ​​खासदार राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे आज, शनिवारी प्रकाशन होणार आहे. यातील अनेक बाबींवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    fadnavis raut new (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: मी कथा, कादंबऱ्या वाचणे कधीच सोडले आहे. कथा, कादंबऱ्या, बालवाङ्मय वाचायचे माझे वय राहिलेले नाही. त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही. त्यांचे सोडून द्या तुम्ही ! ते कोण आहेत, ते खूप मोठे नेते आहेत काय, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.

    खासदार राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे आज, शनिवारी प्रकाशन होणार आहे. यातील अनेक बाबींवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यातच भाजपच्या बुलढाणा जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने शुक्रवारी फडणवीस बुलढाण्याला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खा. राऊत यांच्या पुस्तकाच्या अनुषंगाने प्रश्न विचारताच त्यांनी कथा, कादंबऱ्या वाचणे सोडल्याचा दावा केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महायुतीची भूमिकाही स्पष्ट केली. महायुती एकत्र लढणार आहेच. पण, अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेत वेगळे लढावे लागले तरी महायुतीत सामंजस्य असेल, असेही ते म्हणाले.
    Narayan Rane: सुप्रीम कोर्टाचा राणेंना दणका; पुण्यातील २९ एकर वनजमीन हस्तांतर ठरवले बेकायदा, प्रकरण काय?
    वेगळे लढलो तरी, सामंजस्य राहील
    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्येच लढल्या जातील. अपवादात्मक स्थितीत वेगळे लढलो तरी आमच्यात सामंजस्य राहील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महायुतीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महायुती एकत्र लढणार आहेच. पण, अपवादात्मक परिस्थितीत वेगवेगळे लढलो तरी सामंजस्याने वेगळे लढू. एखाद्या महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेत वेगळे लढावे लागले तरी महायुतीत सामंजस्य असेल, असेही ते म्हणाले.
    महापालिका निवडणुकांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं व्यक्तव्य; म्हणाले, ‘वेगळे लढलो तरी…’
    राज्यभरात महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुका स्वबळावर लढल्या जाणार की युती, आघाडी या माध्यमातून याकडे लक्ष लागले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *