• Wed. Mar 11th, 2026
    पवार, ठाकरेंकडून मोदी-शहांना मदत; संजय राऊतांच्या पुस्तकात खळबळजनक दावा, आज प्रकाशन सोहळा

    Sanjay Raut Book Narkatla Swarg: ‘मी पुस्तकात लिहिलेल्या दोन्ही घटना सत्य आहेत. मी त्यापेक्षाही जास्त लिहू शकलो असतो, पण त्याने फार हाहा:कार माजला असता. मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्याने मी मर्यादा पाळल्या,’ असेही राऊत म्हणाले.

    sanjay raut (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा या दोघांना मदत केली, मात्र त्यांनी उपकाराची जाणीव न ठेवता बाळासाहेबांचाच पक्ष फोडला,’ असा दावा शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केला.

    खासदार संजय राऊत यांनी त्यांची ईडी कोठडी आणि तुरुंगातील दिवस यांवर आधारीत ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहिले असून त्यात हे दावे केले आहेत. या पुस्तकाचे आज, शनिवारी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर, पत्रकारांशी संवाद साधाताना राऊत बोलत होते.
    Devendra Fadnavis: बालवाङ्मय वाचायचं माझं वय नाही! राऊतांच्या पुस्तकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला
    ‘मी पुस्तकात लिहिलेल्या दोन्ही घटना सत्य आहेत. मी त्यापेक्षाही जास्त लिहू शकलो असतो, पण त्याने फार हाहा:कार माजला असता. मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्याने मी मर्यादा पाळल्या,’ असेही राऊत म्हणाले. ‘मोदी यांनी शहा यांच्यासंदर्भात शरद पवार यांच्याशी वारंवार चर्चा केली, विनंती केली, हे मला माहीत आहे. तेव्हा अमित शहा फार कुणाला माहीत नव्हते. माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार यांनी, ‘हा कोण माणूस आहे, ज्याच्यासाठी तुम्ही मला वारंवार फोन करीत आहात?’ असेही मोदी यांना विचारले होते. त्यावर ‘हा माणूस माझ्यासाठी फार कामाचा आहे,’ असे मोदींनी पवार यांना सांगितले होते, असा दावा राऊत यांनी केला.
    Narayan Rane: सुप्रीम कोर्टाचा राणेंना दणका; पुण्यातील २९ एकर वनजमीन हस्तांतर ठरवले बेकायदा, प्रकरण काय?
    ‘राऊतांचे तुम्ही सोडून द्या’
    बुलढाणा/मुंबई :
    शिवसेना (उबाठा)चे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकाविषयी छेडले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी कथा, कादंबऱ्या वाचणे कधीच सोडले आहे. कथा, कादंबऱ्या, बालवाङ्‌मय वाचायचे माझे वय राहिलेले नाही. त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही. त्यांचे सोडून द्या तुम्ही! ते कोण आहेत, ते खूप मोठे नेते आहेत का, असा टोलाही त्यांनी लगावला. तर ‘संजय राऊत कसा माणूस आहे सर्वांना माहीत आहे. त्यांनी पुस्तकात काय लिहिले त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही,’ असे प्रत्युत्तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed