Sanjay Rauat Book : संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत. शरद पवार यांनी यूपीए सरकारमध्ये असताना नरेंद्र मोदींना अटक होण्यापासून वाचवले होते, कारण लोकशाही मार्गाने निवडलेल्या मुख्यमंत्र्याला अटक करणे योग्य नाही, असे पवारांचे मत होते. तसेच अमित शहा खून प्रकरणात आरोपी असताना बाळासाहेब ठाकरेंनी कशी मदत केली होती. याबद्दलह पुस्तकामध्ये सांगितलं गेलं आहे.
उपकारांची आठवण
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्य संघर्ष सुरू होता. याचदरम्यान गुजरातचे अनेक तत्कालीन मंत्री आणि माजी गृहराज्यमंत्री अमित शाहांना तुरूंगात टाकलं होतं. कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींकडे होता. मात्र लोकशाहीने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला अटक करणं योग्य नसल्याचं मत पवारांचं होतं. पवारांनी त्यामुळे मोदींची अटक टळली, मोदींनी या उपकाराचे स्मरण पुढे किती ठेवले? असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut : ‘राजा का संदेश साफ है, अमित शाहांना बाळासाहेबांनी एका फोनवर कसं वाचवलं? संजय राऊतांच्या पुस्तकात खळबळजनक खुलासा
अमित शहा खून प्रकरणात आरोपी होते आणि त्यांना तडीपारही केलं गेलं होतं. अमित शाह यांना जामीन देण्यास सीबीआयच्या पथकाचाही कडाडून विरोध होता. पथकात महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते. त्यावेळी मोदींनी पवारांना फोन केला आणि त्यांनीही स्वभावानुसार मदत केली. शाहांना एका जामीन प्रकरणात मिळाला, हेच अमित शाह महाराष्ट्राशी कसे वागले, असा सवालही राऊतांनी केला आहे.
Mumbai News : दादरमध्ये १४ वर्षांच्या मुलीसोबत कॅब चालकाचे अश्लील चाळे, घरी सोडण्याऐवजी निर्जन ठिकाणी नेऊन विनयभंग
आज गोदीमीडिया झालेला प्रत्येकजण मोदीविरोधी होता. पण त्यावेळी ठाकरे, शिवसना आणि सामना मोदींच्या बाजूने उभा राहिला. त्याच मोदींनी असुरी पद्धतीने फोडली. पवार मोदींना भेटले तेव्हा माझ्यावरील कारवाई टाळली जाईल या भाकडकथांवर माझा विश्वास नव्हता. त्यांनी मला अटक केल्याचं संजय राऊतांनी पुस्तकात म्हटलं आहे.

