Ajit Pawar in Indapur : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका करत अमित शाह मला ओळखतात, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. यादरम्यान श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी छत्रपती कारखान्याला अर्थखात्यातून मदत करण्याचं आश्वासन दिलं.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील कुरवली येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पवार बोलत होते. यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, साखर महासंघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, निवडणूक समन्वयक किरण गुजर ही उपस्थित होते.
HSRP नंबरप्लेटबाबत आता वेगळीच समस्या, ग्राहकांना मनस्ताप; काम कंत्राटदार की वाहनचालकाचं, मोठा संभ्रम
पुढे बोलताना पवार म्हणाले, मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीला जे झालं ते झालं गंगेला मिळालं. ते आता उकरत बसू नका. आपल्या मुलाबाळांचा, प्रपंचाचा विचार करा आणि श्री जय भवानी माता पॅनलच्या उमेदवारांना आपलं पवित्र मत द्या. माझ्याकडे अर्थखातं आहे. ७ लाख २० कोटींचा अर्थसंकल्प मी जाहीर केला आहे. राज्यातील साखर कारखान्यांना जे काही देणार आहे, त्यात पहिला मान छत्रपती कारखान्याला राहिल, असंही ते म्हणाले.
Pune News : २६ दिवस काम पण पगार ४० दिवसांचा; दोन अधिकाऱ्यांच्या भांडणात पुणे महापालिकेत मोठा घोटाळा उघड, प्रकरण काय?
माझी सुरवात या कारखान्यापासून झाली –
माझी सुरवात या कारखान्यापासून झाली. चांगलं काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण अलिकडे कारखाना राज्यात इतरांच्या तुलनेत जसा चालायला हवा होता तसा चालला नाही याची मला खंत आहे. आज मी कारखान्याचा सभासद म्हणून बोलत आहे, उपमुख्यमंत्री म्हणून नाही. उमेदवारी देताना कोण जवळचा लांबचा हे पाहिले नाही. कामगारांनी संस्थेशी बांधिलकी ठेऊन काम केलं पाहिजे. शेजारील श्री सोमेश्वर कारखाना अडचणीत आला होता, मी सभासदांना समजावलं आज राज्यात पहिले पाच कारखाने गणले जातात त्यात सोमेश्वर कारखान्याचे नाव आहे, असंही ते म्हणाले.
Ajit Pawar : मला तर अमित शाह नावाने ओळखतात, तुम्हाला ओळखतात का? अजित पवारांचा विरोधकांना टोला
आजही बॉर्डरवर भारतीय सैन्याचं बारीक लक्ष –
पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा बदला घ्यावा, असा जोर सर्वांचा होता. त्यानुसार पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जवानांनी कशी कामगिरी केली हे आपण सर्वांनी पाहिलं आहे, असं असलं तरी पाकिस्तानचं काही सांगता येत नाही म्हणून आजही बॉर्डरवर भारतीय सैन्याचं बारीक लक्ष आहे, अशीही माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

