• Sat. Mar 7th, 2026

    महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मुलगा बेपत्ता, लग्नाच्या आदल्या दिवशी बाहेर गेला अन्…

    महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मुलगा बेपत्ता, लग्नाच्या आदल्या दिवशी बाहेर गेला अन्…

    Edited byअनिश बेंद्रे | Authored by विनोद वाघमारे | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 14 May 2025, 10:54 am

    Congress leader son missing : ऐन लग्नाच्या तोंडावर मोहोड यांचा मुलगा बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. अमरावती पोलिसांनी वैभव मोहोड यांचा शोध सुरु केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    अमरावती : शहरातील काँग्रेस नेते तथा अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा बेपत्ता झाला आहे. वैभव मोहोड लग्नाच्या एक दिवस आधीच बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.

    काय झालं नेमकं?

    शिवाजी महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या वैभव मोहोड याचा आज, बुधवारी विवाह होता. लग्नासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी तो बाहेर गेला. मात्र बराच वेळ होऊनही मुलगा घरी न परतल्याने वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांकडून वैभव मोहोड याचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे, त्याने सकाळी एटीएममधून चाळीस हजार रुपये काढल्याची चर्चा आहे.

    कोण आहेत हरिभाऊ मोहोड?

    हरिभाऊ मोहोड हे अमरावती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी देखील करण्यात आली होती. हरिभाऊ मोहोड हे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे कट्टर पाठिराखे म्हणून ओळखले जातात. विदर्भातील अभ्यासू नेते म्हणून हरिभाऊ मोहोड यांना मानले जाते.

    दरम्यान, ऐन लग्नाच्या तोंडावर मोहोड यांचा मुलगा बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. अमरावती पोलिसांनी वैभव मोहोड यांचा शोध सुरु केला आहे.
    Pune Crime : शांत चेहऱ्यामागे वादळ दडलेलं, पुण्यातील कष्टाळू दाम्पत्याने आयुष्य संपवलं, हादरवणारं कारण समोर

    जळगावात तरुणाचं टोकाचं पाऊल

    दुसरीकडे, जळगावातील एका तरुणासोबत अत्यंत हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. तरुणाचं लग्न अवघ्या आठ दिवसांवर आलं असताना त्याने टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवल्याची घटना घडली. बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाने आत्महत्या केल्यान सर्वत्र खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री तरुणाने कुटुंबासोबत जेवण केलं, त्यानंतर तो शेतात गेला, मात्र तिथून घरी परत आलाच नाही. त्यानंतर शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं.
    Pune Accident : जुन्या मुंबई-पुणे हायवेवर कंटेनरने चिरडलं, वाढदिवसाच्या आदल्या रात्री कर्तव्यदक्ष पोलिसाचा करुण अंत

    Vaibhav Mohod : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मुलगा बेपत्ता, लग्नाच्या आदल्या दिवशी सामान आणायला गेला अन्…

    लग्नघरात विवाहाची धामधूम सुरु होती. पाहुणे मंडळींना पत्रिका वाटल्या जात होत्या. आठवडाभरावर लग्न आल्यामुळे घरात मोठी तयारी सुरु होती, सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं, असं असतानाच फक्त 21 वर्षांचा नवरदेव अमोल वाल्मिक पाटील याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed