• Wed. Mar 11th, 2026
    आठ हजार हेक्टरवर पाणी! विभागात नाशिकला सर्वाधिक तडाखा; २८ हजार शेतकऱ्यांचा घास हिरावला

    Nashik Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा आणि वादळाचा विभागात सर्वात जास्त तडाखा नाशिक जिल्ह्याला बसला असून, या जिल्ह्यात आतापर्यंत ५८२ गावांतील १४ हजार २८२ शेतकऱ्यांच्या १७ हजार ९२४ हेक्टरवरील विविध पिकांचे मातेरे झाले.

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: नाशिक विभागात गेल्या आठवडाभरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या अस्मानी संकटाने थैमान घातले आहे. यामुळे आतापर्यंत ११९८ गावांतील २८ हजार ८९० शेतकऱ्यांच्या आठ हजार ९३९ हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचा हातातोंडाशी आलेला घास ‘अवकाळी’ने हिरावला आहे. या अवकाळी पावसाचा आणि वादळाचा विभागात सर्वात जास्त तडाखा नाशिक जिल्ह्याला बसला असून, या जिल्ह्यात आतापर्यंत ५८२ गावांतील १४ हजार २८२ शेतकऱ्यांच्या १७ हजार ९२४ हेक्टरवरील विविध पिकांचे मातेरे झाले. नाशिकनंतर विभागात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

    नाशिक विभागात आठवडाभरापासून अवकाळी पाऊस मुक्कामी आहे. ६ मे रोजी सुरगाणा, कळवण, सटाणा, निफाड, चांदवड, शिरपूर, चाळीसगाव, जामनेर, भडगाव, जळगाव, रावेर, मुक्ताईनगर, चोपडा या तालुक्यांत वादळाची तीव्रता जास्त होती. ७ मे रोजी पुन्हा पेठ, त्र्यंबक, शिरपूर, मुक्ताईनगर, बोदवड, साक्री या तालुक्यांत वादळाने दाणादाण उडवून दिली. १२ मे रोजी नाशिक, सुरगाणा, दिंडोरी, साक्री, शिरपूर, शिंदखेडा या तालुक्यांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठे नुकसान झाले. विभागात नंदुरबार जिल्ह्याचा अपवाद वगळता उर्वरित तीनही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी जोरदार तडाखा दिला आहे. भाजीपाला, आंबा, कांदा, बाजरी, मका, केळी, पपई, द्राक्ष बागा अशा पिकाचे आतोनात नुकसान झाले. या अस्मानी संकटात सापडलेले शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाकडून मात्र केवळ पंचनाम्याचे कागदी घोडेनानाचविले जात आहेत.
    Sanjay Raut: गावोगावी ‘डोनाल्ड यात्रा’ काढा; भाजपने अमेरिकेसमोर शरणागती पत्करल्याची राऊतांची टीका
    विभागात सरासरी
    १६ मिमी पाऊस

    नाशिक विभागात मे महिन्याच्या सरासरीच्या १४५.४५ टक्के म्हणजेच १६ मिमी इतका पाऊस झाला. त्यात नाशिक जिल्ह्यात २०.१० मिमी (१५०%), धुळे जिल्ह्यात २२.१० मिमी (२९०.८%), नंदुरबार जिल्ह्यात १५.४ मिमी (२६५.५%), जळगाव जिल्ह्यात १८.४ मिमी (३१७.२%) आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ९.१ मिमी (४९.२%) इतक्या पावसाची नोंद झाली.
    Monsoon 2025: आनंदाची बातमी! यंदा चारही महिने वरुणराजा प्रसन्न, सरासरीहून अधिक पावसाचा IMDचा अंदाज
    विभागात अवकाळीने झालेले नुकसान (क्षेत्र हेक्टरमध्ये)
    दिनांक -बाधित क्षेत्र -शेतकरी संख्या -गावे

    ६ मे —३१५७.५५ –१६८५६ –६९३
    ७ मे —४६७१.०६ –९८६३ –३५३
    १२ मे —१११०.४९ –२१७१ –१५२
    एकूण —८९३०.१० –२८८९० –११९८

    विभागात जिल्हानिहाय झालेले नुकसान (क्षेत्र हेक्टरमध्ये)
    जिल्हा -बाधित क्षेत्र -शेतकरी संख्या -गावे

    नाशिक —१७९२४.४५ –१४२८२ –५८२
    धुळे —२३४९.३० –३०७५ –१८३
    नंदुरबार —२७.८९ –०५ –६
    जळगाव —३२७०.३६ –११४७३ –४२७
    एकूण —८९३९.१० –२८८९० –११९८

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed