Central Railway CSMT-Kalyan : मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील सर्वाधिक गर्दीच्या सीएसएमटी-कल्याण मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची वाढ अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. गेल्या १२ वर्षात केवळ सहा फेऱ्या वाढल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. कल्याण-कसारा आणि कर्जत दरम्यान सुविधा नसल्याने अडचणी येत असून, सीएसएमटी-कल्याण मार्गावर अधिक फेऱ्यांची मागणी जोर धरत आहे.
मुंबई उपनगरी रेल्वे अर्थात मुंबई लोकलमधून रोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. यातील अंदाजे ४० लाखांहून अधिक प्रवासी मध्य रेल्वेवर आहेत. उर्वरित प्रवासी पश्चिम रेल्वेचा वापर करतात. प्रवासी गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेने लोकलची क्षमता वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग केले. त्यातील एक म्हणजे १५ डबा लोकल. बारा डबा लोकलच्या तुलनेत पंधरा डबा लोकलमध्ये प्रवासी क्षमता सुमारे १३ टक्क्यांनी वाढते.
मुंबईत मध्यरात्री ड्रोन उडताना दिसला, परिसरात खळबळ, नागरिकांची तात्काळ पोलिसांना माहिती; २३ वर्षीय तरुणावर FIR, काय घडलं?
मध्य रेल्वेने २०१२-१३ मध्ये सीएसएमटी ते कल्याण दरम्यान १५ डबा लोकल सुरू केली. प्रारंभी या लोकलच्या १६ फेऱ्या होत्या. प्रचंड प्रतिसादामुळे, प्रवासी आणि लोकप्रतिनिधींनी १५ डबा लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी सुरू केली. यामुळे सहा फेऱ्यांची वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. सन २०१९-२० मध्ये १५ डबा लोकल फेऱ्यांची संख्या २२ वर पोहोचली. सद्यस्थितीत पंधरा डबा लोकलच्या अवघ्या २२ फेऱ्या चालवल्या जात आहेत.
काम धीम्या गतीने –
१५ डबा लोकलला प्रतिसाद वाढल्याने कल्याण ते कसारा आणि कर्जतदरम्यान लोकल फेऱ्या सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे मंडळाकडे पाठवला. मुंबई लोकलची क्षमता वाढवणारा हा प्रस्ताव रेल्वे मंडळाने मंजूर केला आणि काम सुरू करण्याच्या सूचना मध्य रेल्वेला दिल्या. मात्र, वाढीव फेऱ्या चालवण्यासाठी कल्याण ते कसारा आणि कर्जत या दरम्यान पुरेशी जागा नसल्याने याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे.
Metro in Mumbai : बीकेसी ते वरळी नाका, गायमुख-ठाणे ते वडाळा, दहिसर ते भाईंदर, ते अंधेरी; चहुदिशांना मेट्रो, कुठून ते कुठे, कशी असणार स्थानकं?
– कल्याण ते कर्जत कसारादरम्यान फलाट नसल्याचे मध्य रेल्वेकडून कारण
– गर्दी विभागण्याच्या प्रयत्नांवर रेल्वेकडून पाणी
– सध्या केवळ २२ फेऱ्या होत असल्याचे वास्तव
प्रवाशांकडून अधिक फेऱ्यांची मागणी –
सीएसएमटी ते कल्याणदरम्यान वाढीव डब्यांच्या फेऱ्या वाढवण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा आहेत. मध्य रेल्वेने १५ डबा लोकल उपलब्ध करून या मार्गावर फेऱ्या वाढवणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी कोणत्याही हालचाली रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नाहीत, अशी खंत या मार्गावरुन प्रवास करणारे प्रवासी अंकित साठे यांनी व्यक्त केली आहे.
४० लाखांहून अधिक प्रवासी मध्य रेल्वेवर, पण १२ वर्षांत अवघ्या सहा फेऱ्या वाढल्याची धक्कादायक बाब, मध्य रेल्वेने सांगितलं कारण
सकाळी ८.३३ ची कल्याणहून सुटणारी १५ डब्यांची लोकल कल्याणमध्येच पूर्ण भरते. डोंबिवलीत चढणाऱ्या प्रवाशांना धक्काबुक्की करूनच या लोकलमध्ये प्रवेश करावा लागतो. कल्याण ते कर्जत, कसारा मार्गावर वाढीव डब्यांच्या फेऱ्यांची गरज असली, तरी फलाटांची लांबी वाढवण्यात अनेक अडचणी आहेत. यामुळे सर्वप्रथम सीएसएमटी ते कल्याणदरम्यान फेऱ्यांची संख्या वाढवावी, असं मत प्रवासी मधुरा भावे यांनी व्यक्त केलं आहे.

