• Tue. Mar 10th, 2026

    Sanjay Raut : “माघार घ्यायची काही गरज नव्हती, देशाची बेअब्रू झाली, इंदिरा गांधी असत्या तर…”

    Sanjay Raut : “माघार घ्यायची काही गरज नव्हती, देशाची बेअब्रू झाली, इंदिरा गांधी असत्या तर…”

    Sanjay Raut : भारत-पाकिस्तान युद्धाला पुर्णविराम मिळाला. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत हे युद्ध थांबवलं. पण पाकिस्तानने रात्री लगेच एक तासाभरानंतर हल्ला चढवला होता. याच पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी अमित शहा यांचा राजीनामा मागितला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : सिंदूर वगरे हे सर्व राजकारण खोटं आहे हे मी स्पष्टपणे सांगतो. माघार घ्यायची काही गरज नव्हती, आपण एका टोकाला जाऊन पोहोचलो आहोत. अशा प्रकारचं अवसानघात करणं हे कोणाच्या तरी दबावाखाली कोणाला तरी फायदा पोचावा असं दिसतंय म्हणून युद्धबंदी जाहीर केली. भारत सरकारने काहीच केलं नाही, भारत सरकार ट्रम्प यांची मध्यस्थी करून कोणाला वाचवत आहे. मुळाच ट्रम्प कोण? नुकसान हे भारताचं झालं आहे. ट्रम्प यांनी इस्त्राईल आणि गाझामधील युद्ध का नाही थांबवलं. जर ट्रम्प यांची मध्यस्थी जगात मान्य केले जाते तर गाझापट्टी बेचिराख केली, एक देश उद्ध्वस्त केला पण ट्रम्प हे इस्त्राइलच्या मागे उभे राहिले. यावेळेला मोदींचे मित्र ट्रम्प हे मोदींच्या मागे उभे राहिले नाहीत. दोन्ही देशांसोबत आमचे चांगले संबंध असल्याचं ते म्हणाले. जगामध्ये भारताला मित्र नाही, मोदी ५०० देश फिरून आलेत मग भारताचा मित्र कोण हे सांगावं. ठामपणे भारताच्या युद्धाला पाठिंबा देणारा देश दाखवावा. ते नाव घेतील जपानचं, पुतिचं याचं त्याचं तेव्हा आम्ही युद्धाला पाठिंबा देऊ. ज्याप्रमाणे चीन आणि तुर्कस्तातने पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला. तटस्थ राहणं म्हणजे पाठिंबा नाही. हे महाशय या देशातून त्या देशात जगात फिरत असतात. कोणत्या देशाने पाठिंबा दिला हे जाहीर करावं. सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
    Monsoon 2025 Update: केरळमध्ये २७ मेपर्यंत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात कधी बरसणार? हवामान विभागाकडून मोठी अपडेट
    अमेरिकेच्या पापाने हे युद्ध का थांबवलं? हा त्यांचा पापा असेल या देशाचा पापा नाही. तुम्ही पापा घेत बसा पण देशाची बेअब्रू झाली, भावना दुखावलेल्या आहेत. २६ महिलांचे सिंदूर पुसले ते अतेरिकी कुठे आहेत. मी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं होतं. जोपर्यंत सहा अतिरेक्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर होत नाही. कुठे आहेत ते नेमके कोणी गुडघे टेकलेत असा सवाल करत राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
    Mumbai Police: दादर चौपाटी बंद राहणार? समुद्रकिनारी जाण्यास मनाई? मेसेज व्हायरल होताच मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण
    दरम्यान, इंदिरा गांधी असत्या तर पाकिस्तान राहिलं नसतं. १९७१ साली पाकिस्तान कुठे राहिलं होतं. पाकिस्तानचे दोन तुकडे करून दोन राष्ट्र निर्माण केले. त्यावेळी ९०-९२ हजार सैन्य आम्ही पाहिलं आहे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री आणि राजीव गांधी यांच्यावरती घाणेरड्या भाषेत टीका करायची. यांच्या पायाचे तीर्थ पिण्याची लायकी नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी फटकारले.
    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed