• Sun. Mar 8th, 2026
    केळी बागांचे नुकसान, शेतकरी त्रस्त; सरकारकडून कर्जमाफीही नाही; जळगावमधील शेतकरी संतापले!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 May 2025, 5:32 pm

    अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. आमचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून मदतीसाठी सरकारकडे आम्हाला अपेक्षा आहे. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात झालेल्या नुकसानासंदर्भात सगळी माहिती दिली.मागच्या वेळीही सरकारने अधिक नुकसान झालेलं असताना तोकडी मदत केली होती. कर्जमाफी देऊ असा व्हिडिओ आहे सर्वांजवळ, शेतकरीही आता अडाणी राहिलेला नाही. कर्जमाफी देत नाही, पिक विमा देत नाही, पिक विमा भरलेले शेतकऱ्यांचे पैसे परत करून दिले. सरकार नाटक करत असून शेतकऱ्यांची संघटना नसल्यामुळेच या गोष्टीचा फायदा सरकार घेत आहे.जळगावमधील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश पाटील यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed