• Thu. Mar 12th, 2026

    अंगावरची हळद ओली, बॉर्डरवर हजर राहण्यासाठी जवानाला कॉल, नववधू म्हणाली “ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवलंय”

    अंगावरची हळद ओली, बॉर्डरवर हजर राहण्यासाठी जवानाला कॉल, नववधू म्हणाली “ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवलंय”

    Operation Sindoor Newly Wed Soldier Called On Duty : लग्नाची मनोहर स्वप्ने, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना, या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी (५ मे) लग्न झालेला मनोज ज्ञानेश्वर पाटील हा जवान कर्तव्य बजावण्यासाठी आज सीमेवर रवाना झाला.

    ऑपरेशन सिंदूरमुळे जवानांना ड्यूटीवर रूजू होण्याचे आदेश (फोटो– Lipi)

    निलेश पाटील, जळगाव : लग्न झाल्यानंतर सर्वांना सुखी संसाराची आवड निर्माण होते. लग्नानंतर फिरायला जाणे वैवाहिक जीवन सुखाने जगणे हे प्रत्येकाला आवडते. मात्र जवान मनोज पाटील यांचे पाच मे रोजी लग्न झाले आणि आठ तारखेला त्यांना देश सेवेसाठी तात्काळ हजर राहण्याचा कॉल आला. कुठलाही विचार न करता मनोज पाटील यांच्या अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदी सह जवान आज (८ मे) रोजी रवाना झाले.
    ऑपरेशन सिंदूरसाठी हनुमानाचा आदर्श, केवळ त्यांनाच मारलं ज्यांनी… राजनाथ सिंह काय म्हणाले?
    देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने जवानांना त्वरित बोलावणे आले आहे. जवानांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक ८रोजी सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला. लग्नाची मनोहर स्वप्ने, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना, या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी (५ मे) लग्न झालेला मनोज ज्ञानेश्वर पाटील (खेडगाव नंदीचे) हा जवान हळदीचा रंग अंगावर असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी आज सीमेवर रवाना झाला.

    Jalgaon News : अंगावरची हळद ओली, बॉर्डरवर हजर राहण्यासाठी जवानाला कॉल, नववधू म्हणाली “ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवलंय”

    नाचणखेड़े (ता. पाचोरा) येथील रामचंद्र पाटी यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लुभान पाटील यांचा मुलगा मनोजचे लग्न ठरले. लग्नासाठी सुटी घेऊन मनोज गावी आले होते. पाचोरा येथे लग्न सामारंभ आटोपत नाही, तोच मनोज यांस कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावणे आले आहे.
    १९४७ काश्मीर युद्ध ते ‘ऑपरेशन सिंदूर’; जाणून घ्या भारत-पाक संघर्षाचा आतापर्यंतचा इतिहास
    कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच देशसेवेच्या कर्तव्यावर जावे लागल्याचा मनोज् यांना गर्व आहे. देशापेक्षा मोठे काहीही नाही, अशा भावना मनोज यांनी व्यक्त केल्या आहेत. मनोज यांची पत्नी यामिनी यांनी देखील या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रया दिली. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच जवानांच्या सुट्ट्या शासनाने रद्द केल्यामुळे घरी परतलेल्या जवानांना पुन्हा देश सेवेसाठी हजर राहावे लागत आहे. यातच स्वतःच्या लग्नासाठी रजेवर आलेला मनोज देखील हातावर सजलेली मेहंदी, अंगावर राहिलेली हळद अशा परिस्थितीत आज देशाच्या कर्तव्यासाठी रवाना झाला. या निर्णयाचे परिसरातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे

    निलेश पाटील

    लेखकाबद्दलनिलेश पाटीलमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मध्ये जळगाव ‘जिल्हा प्रतिनिधी’ म्हणून कार्यरत. गेल्या 12 वर्षापापूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात. तरुण भारत, सकाळ, लाईव्ह ट्रेण्ड न्यूजमधून प्रवास करीत मटा ऑनलाइनपर्यंत प्रवास.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *