भारताकडून पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर, भारतीय लष्कराचं मोठं विधान
कोणत्याही पाकिस्तानी लष्करी आस्थापनेला लक्ष्य केलेलं नाही. या हल्ल्यात कोणतीही पाकिस्तानी लष्करी मालमत्ता लक्ष्य करण्यात आली नाही. भारताने आपले लक्ष्य निवडण्यात संयम बाळगला आहे. ऑपरेशन सिंदूर’चा उद्देश फक्त दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करणं होता. भारताने केलेला हल्ला शेजारी देशाशी लढण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला नाही.
