• Sat. Mar 7th, 2026
    Maharashtra Water Crisis: राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दोन हजारांवर गावे, वाड्यांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरु

    Edited byकिशोरी तेलकर | Authored by पंकज मोहरीर | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 4 May 2025, 2:37 pm

    Maharashtra Water Crisis: यंदाचा उन्हाळा चांगलाच तापदायक ठरला आहे. उन्हाच्या झळा तीव्र होत असताना पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली. परिणामी मागील काही दिवसात टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.

    water tanker AI photo (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    पंकज मोहरीर, चंद्रपूर : राज्यातील जलसाठा कमी झाला असून आता लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांत केवळ ३३.७१ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. ७५८ गावांत व २ हजार २५७ वाड्यांत ९३६ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

    यंदाचा उन्हाळा चांगलाच तापदायक ठरला आहे. उन्हाच्या झळा तीव्र होत असताना पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली. परिणामी मागील काही दिवसात टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे हे विशेष. पण उन्हाची तीव्रता वाढली तशी टँकरची संख्या वाढत आहे. वेगाने वाढणारी टँकरची संख्या ही सर्वांनाच धक्का देणारी ठरत आहे. राज्यातील २ हजार ९९७ प्रकल्पांमध्ये एकूण ४० हजार ४९८ दशलक्षघनमीटर जलसाठा क्षमता असून सद्या ३३.७१ टक्केवारीने १३ हजार ६५३ दशलक्षघनमीटर उपयुक्त साठा उरला आहे. २०२४ मध्ये हा पाणीसाठा याच कालावधीत २९.८६ टक्के होता. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वाधिक २३० गावांत व ४४ वाड्यांत पाणीटंचाई असून ३४९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात २१० गावे व ७४५ वाड्यांमध्ये २१८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुणे विभागात १६७ गावे व १ हजार १२५ वाड्यांमध्ये १७२ टँकरने तर ठाणे व कोकण विभागात ७२ गावे व ३४३ वाड्यांत १०५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
    निम्म्या नाशिकवर बांधकाम मर्यादा; एचएएल विमानतळ, आर्टिलरी सेंटरमुळे येणार निर्बंध, काय कारण?
    तूर्त पाण्याच्या भीषण टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत नसले तरी सध्या राज्यातील काही धरणे तळाशी जाण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय अनेक धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. त्यातच अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत, तर बोअरवेलची पाणीपातळी खोल जाऊ लागली आहे.
    Waves 2025: नागपुरात जगातील सर्वात मोठे चित्रपटगृह उभारणार; ‘वेव्हज २०२५’ परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा
    नागपूर विभागात १५, अमरावतीत ६४ गावांमध्ये टंचाई
    विदर्भातील धरणांच्या जलसाठ्याची स्थिती बघता नागपूर विभागात ३५.८९ टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. या विभागात १५ गावांत १५ टँकर लागले आहेत. ते सर्व नागपूर जिल्ह्यात आहेत. अमरावती विभागात आता एकूण ४३.८२ टक्के जलसाठा उरला आहे. या विभागात ६४ गावांत ७७ टँकर लागले असून त्यानेच पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
    नागपूर घरफोड्यांचा ‘हॉट झोन’! ४ महिन्यांत चोरट्यांकडून ५ कोटी ७१ लाखांच्या ऐवजांवर डल्ला
    जलसाठ्याची सद्यस्थिती

    • कोकण विभाग : ४१.४२ टक्के
    • मराठवाडा विभाग : ३३.३३ टक्के
    • नागपूर विभाग : ३५.८९ टक्के
    • अमरावती विभाग: ४३.८२ टक्के
    • नाशिक विभाग: ३७.७९ टक्के
    • पुणे विभाग : २७.२६ टक्के
    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed