• Sun. Jun 7th, 2026

    Prati Tuljapur : ठाण्यात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रति तुळजापूर मंदिर खुले, देवी भक्तांची पहिल्याच दिवशी उसळली गर्दी

    Prati Tuljapur : ठाण्यात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रति तुळजापूर मंदिर खुले, देवी भक्तांची पहिल्याच दिवशी उसळली गर्दी

    Prati Tuljapur Thane Temple : ठाण्यात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रति तुळजापूर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. शरद पवार यांच्या हस्ते तुळजाभवानीची पूजा झाल्यावर दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मंदिरात हेमाडपंती शिल्पकलेचा वापर केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    विनित जांगळे, ठाणे : फुलांची आरास…मंत्रांचा जयघोष आणि देवी भक्तांची उसळलेली गर्दी अशा भक्तिमय वातावरणात साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर बुधवारी ठाण्यात प्रति तुळजापूर मंदिर खुले करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या उपस्थितीत तुळजाभवानीची शास्त्रोक्त पूजा संपन्न झाली. त्यानंतर देवीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाचपाखाडी येथील गणेशवाडी परिसरात पाहायला मिळाली.

    दगडी खांब, उंच कळस, गजमुख दगडी हवनकुंड, दीपस्तंभ –

    विधिवत मंत्रोच्चाराच्या साक्षीने भक्तिमय वातावरणात ठाण्यात साकारण्यात आलेल्या चा प्राणप्रतिष्ठापना सोहळा तीन दिवसांपासून सुरु होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मंदिरात दगडी खांब, उंच कळस, सभोवती गजमुख व प्रांगणात दगडी हवनकुंड, दीपस्तंभ असा हेमाडपंती शिल्पकलेचा अविष्कार आहे.
    Satara News : ग्रामदैवताच्या यात्रेहून आले, घराच्या ओट्यावर निवांत झोपले, मद्यधुंद पोलीसाची गाडी धडकली अन् तिथंच जीव गेला
    मंदिर खुले होण्याआधीच या भागात भाविकांची भलीमोठी रांग दर्शनासाठी लागली होती. या रांगेत अबालवृद्धांचा समावेश होता. देवीच्या दर्शनासाठी नवजात बाळाला घेऊन भक्तगण हजर होते. तसेच मंदिराचे भव्यदिव्य रूप मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी गर्दी झाली होती. यासोबत लग्न सोहळ्याची निमंत्रण पत्रिका देवीच्या चरणी वाहण्यासाठी भक्त मंदिरात आले होते.

    महाआरती, गोंधळ – जागरणाचा जयघोष

    बुधवारी रात्री जितेंद्र आव्हाड सपत्नीक महाआरती सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यानंतर गोंधळ – जागरणाला देवी भक्तांनी गर्दी केली होती. कोणत्याही जाती, धर्म आणि पंथाचे नागरिक या देवळात प्रवेश करू शकतात. विधिवत पूजेनंतर आता हे मंदिर भक्तांसाठी नेहमी खुले राहील, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

    दरम्यान, या भागात २१ वर्षे जुने तुळजाभवानीचे मंदिर होते. मात्र वाढलेल्या नागरिकरणामुळे हे मंदिर रस्त्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा येत होता. त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय जितेंद्र आव्हाड यांनी घेतला. जुन्या मंदिराशेजारीच नव्या मंदिराच्या उभारणीचं काम चार वर्षांपासून सुरु होतं. अखेर आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हे मंदिर खुलं करण्यात आलं आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed