• Mon. Mar 9th, 2026
    अंजली दमानिया यांनी उपस्थित केला सवाल

    Anjali Damania On Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाले. विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवला. मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला, जो स्वीकारण्यात आला. राजीनाम्यानंतर मुंडे यांनी आरोग्याचे कारण दिले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप करण्यात आली. कराड सध्या कोठडीत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येवेळचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि मोठी खळबळ निर्माण झाली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरूवातीपासूनच आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात येत होती. धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी मोठा दबाव होता.

    अंजली दमानिया यांनी उपस्थित केला मोठा प्रश्न

    संतोष देशमुख हत्या प्रकरणात सतत आरोप होत असताना धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला देखील. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या राजीनाम्यानंतर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि त्यांनी आरोग्याचे कारण पुढे केले आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही भाष्य केले.
    Bhaskar Jadhav : बस भरलेली, ड्रायव्हर अचानक आजारी… भास्कर जाधवांनी स्टेअरिंग हातात घेत चालवलेली एसटी, काय घडलेलं?धनंजय मुंडे यांच्या नावाची पाटी मंत्री म्हणून मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तशीच

    धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याच्या अगोदर अंजली दमानिया सतत त्यांच्यावर आरोप करताना दिसल्या. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि तो स्वीकारला देखील गेला आहे. मात्र, मंत्रालयातील धनंजय मुंडे यांच्या नावाची पाटी ही मंत्री म्हणून कार्यालयाबाहेर तशीच लावलेली आहे, ती काढण्यात आली नाहीये. यावरून आता अंजली दमानिया यांनी मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.

    धनंजय मुंडे यांच्या नावाची पाटी कधी हटवली जाणार?

    अंजली दमानिया यांनी म्हटले की, अजूनही मंत्रालयात त्यांच्या नावाचे कार्यालय कशासाठी? आणि मंत्री म्हणून पाटी कशासाठी? काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्हाचे पालकमंत्रिपद स्वीकारले आहे. पालकमंत्रिपद घेतल्यानंतर दोन वेळा अजित पवार हे बीडच्या दाैऱ्यावर गेले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. संतोष देशमुख प्रकरणावरही बोलताना अजित पवार हे दिसले होते.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed