नागपूरमध्ये अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत बोलताना काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी राज्यात पेशवाई परतल्याची टीका केली. या पेशवाईचा नायनाट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात श. नु. पठाण, फिरदोस मिर्झा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परिषदेत दहशतवादाचा निषेध, दारुबंदी, जातनिहाय जनगणना यांसारखे महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.
Husain Dalwai : ‘राज्यात पुन्हा पेशवाई, तिचा नायनाट आवश्यक’, हुसेन दलवाई यांचे वक्तव्य
