Shivsena MLA Sanjay Gaikwad On Police Department : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पोलिस खात्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस खातं जगात सर्वात अकार्यक्षम आहे, असे ते म्हणाले.
‘पोलीस खात्यासारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात, जगात कुठेही नाही. शासनाने कोणताही कायदा केला, की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली तर गुटखा द्यायचा पण यांचा हप्ता वाढला. दारू बंद केली की चालू करायची, यांचा एक हप्ता वाढला. या राज्यातील पोलिसांनी, देशातील पोलिसांनी इमानदारीने काम केलं ना, तर या जगातील सगळी गंदगी खतम होईल. यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ एवढं चांगलं केलं, तर सगळी गुन्हेगारी खतम होईल’, अशा शब्दात यांनी पोलिसांवर खालच्या पातळीवर टीका केली आहे.
Pahalgam Attack : तर आम्ही जिवंत आलोच नसतो… पहलगामला जाण्याआधी रस्ता खचला आणि बचावले; मुंबईकर कुटुंबाला अश्रू अनावर
दरम्यान, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरही प्रतिक्रिया दिली होती. २६ चा बदला २६० ने घ्या अशा शब्दात त्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला होता. पुन्हा एकदा त्यांनी पीओकेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारकडून चूक मान्य? घटनास्थळी सुरक्षा का नव्हती, समोर आलं मोठं कारण
‘आपल्या पंतप्रधानांनी निर्णय घ्यायचा असेल तर इस्त्राइलच्या पंतप्रधानांसारखा निर्णय घ्यावा. त्यांच्या घरात घुसून रोखठोक भूमिका घ्यावी ही काळाची गरज आहे. जल करार स्थगित करण्याने काहीही साध्य होणार नाही. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतल्याशिवाय आतंकवादाची समस्या संपणार नाही. एकदा का पीओके खतम करुन टाका, पीओके ताब्यात घ्या आणि मग बॉर्ड्री करा. यामुळे आपल्या देशात कोणी घुसणार नाही’, असा सल्लाही त्यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे.
Sanjay Gaikwad : ‘महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात नाही, इमानदारीने काम केलं तर…’, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याने वाद
‘संपूर्ण भारतवासियांच्या भावाना तीव्र आहेत. ज्या पद्धतीने जात पाहून, धर्म तपासून, लिंग तपासून जे कृत्य १९८७ पासून काश्मीरमध्ये चालू होतं, की गावागावाच्या गाड्या अडवायच्या, माणसं खाली उतरवायची, बाईच्या कपाळाचंय कुंकू पाहायचं, कुंकू असेल तर तिच्यावर अत्याचार करायचा, लिंग तपासायचं, हिंदू असेल तर गोळ्या घालायच्या हे क्रूर कृत्य पाकिस्तानने केलं आहे. जे लोक सांगतात आतंकवादाला चेहरा नाही सांगतात, मी जाहीरपणे सांगतो हा इस्लाम आतंकवाद आहे. हा पाकिस्तानचा आतंकवाद आहे. जम्मू – काश्मीरमधील हिंदू लोकांना भारतीय हिंदू लोकांना खतम करण्याचा हा आतंकवाद आहे. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी खंबीरपणे भूमिका घेऊन २६ चा बदला २६० ने कसा घेतला जाईल, हे हाती लागले, तर कसाबसारखी त्यांना बिर्याणी देऊ नका, यांनी आमची माणसं मारली, यांच्या माना छाटल्या पाहिजेत’, अशा तीव्र शब्दात संजय गायकवाड यांनी हल्लाचा निषेध केला आहे.

