Dr. Shirish Valsangkar Death Case: न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. याप्रकरणातील संशयीत आरोपी मनीषा मुसळे माने यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सध्या न्यायालयीन कोठडीत ठीक आहे, परंतु तपासासाठी गरज पडल्यास पुन्हा एकदा पोलीस कोठडी द्यावी. संशयीत आरोपी महिला कर्मचारी मनीषा मुसळे माने यांच्या वकिलांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना स्पष्ट सांगितले की, खऱ्या बाबी अजूनही कोर्टात सादर केल्या गेल्या नाहीत, गृहकलहाची बाब कोर्टात समोर आलीच नाही. एका ईमेलवरून डॉक्टर शिरीष वळसंगकर आपला जीव देणार नाहीत, असे ऍड. प्रशांत नवगिरे यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे
Shirish Valsangkar : मनीषा मानेंना दीड लाख पगार, डॉ. वळसंगकरांना कशाला त्रास देईल? वकिलांनी चिठ्ठीचा मुद्दा काढला
मनीषाच्या विरोधात वळसंगकर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तक्रारी मांडल्या
ऍड प्रशांत नवगिरे यांनी माहिती देताना सांगितले, मनीषा मुसळे माने या 2008 पासून एसपी न्यूरोसायन्स म्हणजेच वळसंगकर रुग्णालयात कार्यरत होत्या. मनीषा मुसळे माने यांच्या विरोधात रुग्णालयातील 27 कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमोर लेखी जबाब दिला आहे. ऍड प्रशांत नवगिरे यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. मनीषा माने यांचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्रास होता, तर त्यांनी आपल्या आयुष्याची अखेर न करता प्रमुख डॉक्टर कसे काय असं काही करू शकतात करतात असा सवाल ऍड प्रशांत नवंगिरे यांनी उपस्थित केला आहे .पोलिस प्रशासन ज्या वेळी संपूर्ण दोषारोप पत्र दाखल करतील त्यावेळी आम्ही जोरदार युक्तिवाद करू असेही ऍड प्रशांत नवंगिरे यांनी माध्यमांसमोर बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
मनीषा मुसळे मानें हिने माफीनामा लिहिला होता
एसपी न्यूरोसायन्स रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी व सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेली मनीषा मुसळे माने यांनी डॉ शिरीष वळसंगकर (न्यूरोफिजिशियन) यांना एक मेल केला होता. त्या मेलची दखल घेत डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री राहत्या घरी मोदी या ठिकाणी स्वतःच्या डोक्यात पिस्तुलमधून गोळी झाडून आपल्या आयुष्याची अखेर केली होती. डॉ. वळसंगकर यांनी ज्या रात्री आपला जीव दिला, त्याच दिवशी मनीषा मुसळे माने यांनी डॉक्टरांना माफीनामा लिहून दिला होता, अशी महत्वपूर्ण माहिती ऍड प्रशांत नवंगिरे यांनी दिली आहे. पोलिसांनी दोषारोप पत्र सादर केल्यानंतर, युक्तिवाद करताना सर्व बाबी समोर येतील असेही नवंगिरे यांनी सांगितले.

