• Thu. Mar 12th, 2026
    Weather Update: सूर्य आग ओकतोय! ब्रम्हपुरी सर्वाधिक उष्ण, अकोल्यात पारा ४५ पार, तुमच्या शहरात काय परिस्थिती?

    Maharashtra Weather Update Today: राज्यात उन्हाची दाहकता वाढतच चालली आहे. एप्रिल महिन्यातच पारा ४० च्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

    (फोटो– Lipi)

    निलेश झाडे, चंद्रपूर: विदर्भात चंद्रपूर जिल्हातील ब्रम्हपुरीचे आज सर्वाधिक होते. पारा 45.9 अंशावर पोहचला.अकोला जिल्हावरही सूर्य प्रकोप झाला. अकोल्याचे तापमान 45.2 अंश होते. या आठवड्यात सलग दोनदा जगातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलेलल्या चंद्रपूरचा तापमाणात काहीशी घट झाली.चंद्रपूरचे तापमान 45 अंश होते.चंद्रपूर जिल्हातील काही भागात तापमानाचा पारा वाढलेला असताना काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला आहे.

    चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्हात येणारे ब्रम्हपुरीसाठी एप्रिल महिना तापदायक ठरत आहे. या आठवड्यात चंद्रपूर पुन्हा एकदा सर्वाधिक उष्ण शहर ठरले तर एकदा देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूरच्या नावाने नोंदवल्या गेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या ब्रह्मपुरी शहराने आज चंद्रपूरलाही मागे टाकले आहे. विदर्भातील सर्वाधिक तापमान आज ब्रह्मपुरीचे होते. पारा 45.9 वर पोहचला.

    मराठवाड्यातही तशीच परिस्थिती आहे. नांदेड, परभणी येथे 44 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर, बीडमध्ये पारा 43.4 आणि धाराशिव येथे 42 अंशावर गेला आहे. पुण्यात 41.2 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आलं आहे. अहिल्यानगर येथे 40.9, नाशकात 40.2, तर सोलापुरात 43.8 इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे. मुंबई आणि उपनगरांमध्येही प्रचंड उकाडा जाणवू लागला आहे.
    Palghar News: सात महिन्यांचं बाळ आईच्या हातातून निसटलं, २१व्या मजल्यावरुन खाली पडलं अन् क्षणात सारं संपलं; मन सुन्न करणारी घटना

    विदर्भावर सूर्य कोपला

    खरंतर विदर्भासाठी उन्हाळा नेहमीच तापदायक ठरतो. सूर्य अक्षरश: येथे आग ओकत असल्याचा भास होतो.दुपारच्या सुमारास घराच्या बाहेर जाणे जीवावर येते. ही स्थिती असते मे महिन्यात. मात्र, यावर्षी एप्रिल महिन्यातच ही उष्णता नकोशी झाली आहे. दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडल्याचे दिसून येत आहे. घरातील कुलर-एसी काम करेना अशी स्थिती उद्भवली आहे.

    दुसरीकडे, जिल्हातील काही भागात वादळी पावसासह गारपीट झाली आङे. वादळाने अनेक घरांवरील छते उडाली. मार्गांवरील झाडे कोसळली. या पावसामुळे मका, भाजीपाला, मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे. तर, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचं वाटत असलं तरी उकाडा काही कमी झालेला नाही. मे महिन्यात यापेक्षाही भयंकर स्थिती असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed