Pahalgam Terror Attack: रत्नागिरीत जिल्ह्यातील सर्व पर्यटकांशी संपर्क झाला असून, ते सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासन सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे’, अशी माहिती माहिती बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
‘हातखंबा येथील श्री टुरिझमद्वारे ३४, तर अमृता ट्रॅव्हल्समार्फत सहा जण पर्यटनासाठी गेले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत नियंत्रण कक्षाकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. हे सर्वजण सुखरूप आहेत’, असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, रत्नागिरी येथील शासकीय महाविद्यालयातील डॉ. कुणाल देसाई यांच्या नेतृत्वाखाली २० जणांचे पथक काश्मीरला गेले आहे. याबाबत माहिती मिळताच पालकमंत्री उदय सामंत यांनी संपर्क साधून त्यांची चौकशी केली. हे सर्वजण श्रीनगर येथे सुखरूप असून, २८ एप्रिल रोजी रत्नागिरीत परतणार आहेत.
विमान कंपन्यांची ‘दहशत’! ऐन वेळी प्रवासी भाड्यात वाढ, श्रीनगरहून येण्यासाठी तिकीटदर किती?
विदर्भातील ३२३ पर्यटक अडकले …
पहलगाममध्ये हल्ल्यानंतर विदर्भातील ३२३ पर्यटक जम्मू-काश्मिरमध्ये अडकले आहेत . यात नागपुरातील १९४, बुलढाण्यातील ५०, अमरावतीचे ३६, अकोल्यातील ३०, चंद्रपुरातील सात आणि गोंदियातील सहा पर्यटकांचा समावेश आहे . ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पर्यटकांना परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
पर्यटकांसाठी मोठी बातमी! IRCTCच्या पूर्वनियोजित सहली रद्द; पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्णय
‘नंदनवनाची झाली नरकभूमी’: रुपाली ठोंबरे-पाटील
पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हजारो पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे-पाटील यासुद्धा कुटुंबीयांसोबत अडकल्या. ‘अवघ्या २४ तास आधी आम्ही पहलगामला जाऊन तिथले निसर्गसौंदर्य अनुभवले, त्या ठिकाणीपर्यटकांवर हल्ला झाल्याचे ऐकून आम्ही हादरलो आहोत,’ अशी भावना त्यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना व्यक्त केली. ठोंबरे बुधवारी रात्री कुटुंबीयांसोबत दिल्ली येथे परतल्या. ठोंबरे कुटुंबीय आणि मित्रपरिवार असे १२ जण १८ एप्रिलला जम्मू आणि काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. सोमवारी दुपारीच त्या पहलगाम येथेही कुटुंबासोबत गेल्या होत्या. त्यावेळचे फोटो आणि व्हिडीओही त्यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केले होते.

