CM Devendra Fadnavis Tweet over Pahalgam Attack : पहलगाममधील हल्ल्यात २८ पर्यटकांचा करुण अंत झाला आहे, ज्यामध्ये राज्यातील ६ जणांचा समावेश आहे. तर काही पर्यटक अद्यापही काश्मीरमध्येच अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
ट्विटमध्ये नमूद करण्यात आले की, मुख्यमंत्र्यांनी काश्मिरमधील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यास सांगितल्यानंतर, उद्या दि. २४ एप्रिल २०२५ रोजी श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. इंडिगोचे हे विमान महाराष्ट्रातील 83 प्रवाशांना घेऊन मुंबईत येणार आहे. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडण्यात आली आहे.
ट्विटमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, ‘उद्यासाठीच आणखी एक विमानाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठीच्या प्रवाशांची यादी सुद्धा तयार होत आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानाचा खर्च राज्य सरकार करणार आहे.’
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकून पडलेल्या राज्यातील प्रवाशांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेची मदत पथक काल श्रीनगरला रवाना झाले होते. यातच आज स्वतः उपमुख्यमंत्री एकनाख शिंदेही जम्मू आणि काश्मीरला गेले आहेत. यामुळे मदतकार्याला हातभार लागणार असल्याचे शिंदेंनी म्हटले आहे.

