Anjali Damania On Pankaja Munde : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर पडसाद उमटले, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवर अंजली दमानिया यांनी टीका केली आहे. आता नुकताच पंकजा मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांच्यावर जोरदार टीका केली.
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी म्हटले होते की, मी तर म्हणते की धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शप्पथच घ्यायचा नव्हती पाहिजे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणी दरम्यान पंकजा मुंडे यांनी भाष्य करणे टाळले होते, ज्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. हेच नाही तर अनेकांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत थेट पंकजा मुंडे यांच्याही मंत्रिपदाचा राजीनामा मागितला होता.
Maharashtra Cabinet Decision : महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय, मत्स्य व्यवसायाला आजपासून कृषी दर्जा!आता नुकताच अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली. अंजली दमानिया म्हणाल्या की, पंकजा मुंडे यांचे जे वक्तव्य होते ते मी अगदी व्यवस्थितपणे ऐकले. अशा घटना सगळीकडे घडत असतात…मी जालन्याची पालकमंत्री आहे, तिथे देखील अशा घटना घडतात आणि ही मानसिक विकृती आहे, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे त्यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटले आहे. मला पंकजा मुंडे यांना एकच विनम्रपणे म्हणायचे आहे.
अशा घटना ज्या इतर ठिकाणी घडतात, त्या गॅंगवार नसतात. इथे बीडमध्ये काय झाले एक नेता आहे. त्याने कराडसारखा माणूस क्ररकृत्य करण्यासाठी ठेवला आहे. या कराडच्या अनेक गॅंग आहेत. या गॅंग मिळून एका माणसाला जो त्याच्या विरोध लढतो त्याला तुडवतात आणि त्याची हत्या करतात, अशा घटना सगळीकडे घडतात. एका माणसाला दुसऱ्या माणसाने मारणे या घटना सगळीकडे घडतात.
अंजली दमानिया यांचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल, म्हणाल्या, दहा वेळा विचार करून बोला…
या अशा घटना सगळीकडे घडत नाहीत. कदाचित तुम्हाला माहिती नसेल. तुम्ही जे बोलले त्याच्यावर तुम्ही दहा वेळा विचार करून बोला. अशी विनंती मी तुम्हाला करते, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. यावेळी अजित पवार यांनी एक रूपया पिक विमा योजनेबद्दल केलेल्या विधानावर बोलतानाही अंजली दमानिया या दिल्या. अंजली दमानिया या मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना दिसल्या.

