• Mon. Mar 9th, 2026
    पहलगाम दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन आणि पनवेलमधील एकाचा मृत्यू

    Pahalgam Terrorist Attack News : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने यांचा मृत्यू झाला आहे. ते आपल्या कुटुंबासोबत काश्मीरला फिरायला गेले होते. या दुर्घटनेत पनवेलमधील दिलीप देसले यांचाही मृत्यू झाला असून सुबोध पाटील जखमी झाले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पहलगाम : काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने यांचा मृत्यू झालाय. अतुल मोने डोंबिवली पश्चिमेकडे ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीमधील रहिवासी होते. अतुल श्रीकांत मोने कुटुंबासह फिरण्यासाठी काश्मीर पेलगम येथे गेल्याची माहिती मिळतंय. मुलगी बायको आणि यांच्यासह त्यांचे नातेवाईकांची तीन कुटुंब गेल्याची गेली होती. अतुल मोने रेल्वेमध्ये परेल वर्क शॉप सेक्शन इंजिनियरपदी कार्यरत असल्याची माहिती आहे. डोंबिवलीकर अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी या तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे.

    डोंबिवलीतील अतुल मोने यांच्यासह दोघांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू

    मोने यांच्या निधनाबद्दल कळताच नातेवाईक काश्मीरला रवाना झाले आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा बसलाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल यांनी दिलेल्या माहिती नुसार, पेहलगाम काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता निसर्ग ट्रॅव्हल्स पनवेल येथून एकूण 39 पर्यटक जम्मू काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. त्यातील दिलीप देसले, राहणार खांदा कॉलनी पनवेल हे सदर हल्ल्यात मयत झालेले आहेत.
    पहलगाममधून दहशतवादी हल्ल्याचा व्हिडीओ समोर, क्षणातच धडाधड गोळ्या आणि…दिलीप देसले राहणार पनवेल यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू

    तसेच सुबोध पाटील राहणार पनवेल हे जखमी झालेले आहेत (माणिक पाटील ह्या सुबोध पाटील यांच्या पत्नी आहेत) त्यांना श्रीनगर येथे हॉस्पिटलमध्ये एयरलिफ्ट करून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. इतर सर्व पर्यटक सुरक्षित आहेत अशी माहिती रायगड जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीये. पुण्यातील काही पर्यटकांना या हल्ल्यात गोळ्या लागल्याचीही माहिती मिळत आहे.

    पंतप्रधान मोदी विदेशी दाैरा अर्धवट सोडून भारतात होणार काही वेळात दाखल

    नरेंद्र मोदी हे विदेशातील दाैरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत. मध्यरात्रीपर्यंत मोदी भारतात दाखल होतील. दुसरीकडे हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर अमित शहा हे देखील तातडीने काश्मीरला रवाना झाले. हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांकडून धर्म विचारून टार्गेट केल्याचे सांगितले जातंय. सुरक्षा यंत्रणा कामाला लागलीये. इतका मोठा हल्ला झाला. मात्र, याची माहिती यंत्रणेंना कशी लागली नाही, यावरून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed