• Mon. Jun 15th, 2026

    शेतकऱ्यांची 170 पोरकी लेकरं सांभाळणारे हात हरपले, कसारा घाटात अपघात, राजश्री गायकवाडांचं निधन

    शेतकऱ्यांची 170 पोरकी लेकरं सांभाळणारे हात हरपले, कसारा घाटात अपघात, राजश्री गायकवाडांचं निधन

    Mumbai Businesswoman dies in Car Accident : घाटात गाडी रस्त्यावरून थोडी खाली उतरली. राजश्री बसलेल्या बाजूला एका दगडाला गाडीची धडक बसली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    ठाणे : कसारा घाटात झालेल्या कार अपघातात 45 वर्षीय व्यावसायिक राजश्री गायकवाड यांचे निधन झाले. राजश्री यांचे पती प्रशांत गायकवाड हे मुंबई महापालिकेत महापालिका उपआयुक्त (वित्त) म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी दुपारी राजश्री गायकवाड यांचा अपघात झाला. त्या नाशिकला एका व्यावसायिक मीटिंगसाठी निघाल्या होत्या. गाडी घाटातून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दगडाला धडकली. यात राजश्री यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.

    शनिवारी प्रशांत गायकवाड बोरिवलीमध्ये एका बैठकीसाठी जात असताना त्यांना अपघाताची माहिती मिळाली. अपघातावेळी राजश्री यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. तर कंपनीचे सीईओही त्यांच्यासोबत होते. पोलिसांनी सांगितले की, घाटात गाडी रस्त्यावरून थोडी खाली उतरली. राजश्री बसलेल्या बाजूला एका दगडाला गाडीची धडक बसली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला. गाडीतील इतर दोघांना कोणतीही मोठी दुखापत झालेली नाही.

    राजश्री गायकवाड यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी ऐरोलीमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुंबई महापालिकेचे अनेक कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी राजश्री गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली. महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांनीही गायकवाड कुटुंबीयांची भेट घेतली. कसाऱ्याच्या पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताला जबाबदार कोण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

    राजश्री गायकवाड सामाजिक कार्यातही सक्रिय होत्या. त्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या १७० मुलांची जबाबदारी घेतली होती. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते.
    Solapur News : ए पप्पा… ए पप्पा… आरोही ओरडत होती; बाबांचा काळीज पिळवटणारा टाहो, ट्रेनवर फेकलेल्या दगडाने जीव घेतला
    अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक आपत्कालीन व्यवस्थापन टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी जखमींना कसाऱ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे राजश्री यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    कसाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश गावित म्हणाले, “ड्रायव्हरने सांगितले की, मागून कोणीतरी त्यांच्या गाडीला धडक दिली. पण आम्हाला मागून धडक दिल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. रस्त्यावर वळण असल्याने गाडी चालवताना त्याचा ताबा सुटला असावा, असे दिसते.”
    Solapur Crime : 25 वर्ष एकत्र काम, ईमेलवरुन धमकी अन्… डॉ. वळसंगकरांनी आयुष्य संपवलं, अटकेतील महिला मनिषा मुसळे-माने कोण?
    राजश्री गायकवाड यांच्या निधनाने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed