• Sat. Mar 7th, 2026

    कौतुकास्पद ! बीडमधील तरूणानं बायकोचं सोनं मोडत भागवली गावकऱ्यांची तहान, Video व्हायरल

    कौतुकास्पद ! बीडमधील तरूणानं बायकोचं सोनं मोडत भागवली गावकऱ्यांची तहान, Video व्हायरल

    बीड जिल्ह्यातील एका तरुणाने गावकऱ्यांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहिले आणि बायकोचे सोने मोडत गावकऱ्यांची तहान भागवली आहे. त्या तरुणाला आता गावकरी जलदूत म्हणत आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    दीपक जाधव, बीड: बीड जिल्ह्यात उन्हाळ्यात शेतकऱ्यासह अनेक खेड्यापाड्यातील वाडीवस्तीवरील लोकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. या पाण्यासाठी मैलोन मैल भटकंती करावे लागते यातच जरूड गाव आणि त्या बाजूचे पाच गाव हे नेहमीच होरपळताना पाहायला मिळतात. गावातल्या लोकांच्या घशाला कोरड पडली आहे आणि त्यांना मैलोन मैल जाऊन पाणी मिळत नाही, त्यात घरच्या प्रत्येकाच्या लक्ष्मीची पायपीट एका तरुणाला बघवली नाही. यासाठी त्याने थेट आपल्या बायकोचं सोनच मोडलं आणि बनला एका गावात सह पाच गावांचा जलदूत. राजेश काकडे हे या तरुणाचे नाव आहे.

    राजेश काकडे बीड पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेलं जरूड गावचा हा रहिवासी. थोडाफार शिकलेला मात्र लोकसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेला गावची तहान भागवण्यासाठी यांना थेट आपल्या बायकोच्या अंगावरील सोनं विकून बोरवेल घेतला आणि या बोरवेलला इतकं पाणी लागलं की एका गावासह पाच गावाची ताण देखील या बोरवेलवर भागवली. मात्र कालांतराने या बोरचंही पाणी कमी पडू लागलं आणि त्यात त्याने अजून एक बोर घेऊन पंचक्रोशीतील गावांना पाणी द्यायचा संकल्प केला. या संकल्प मुळे उन्हाळ्यात आता जवळपास अनेक गावांची तहान भागते हा तरुण सध्या जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात जलदूत म्हणून ओळखला जात आहे.

    राजेश स्वतःची बाजरी डाळिंब आणि मोसंबीचं पीक हे वाया जाऊ दिले. कारण पाणी गावाला देण्यासाठी त्यांनी शेताला पाणी दिलेच नाही. यामुळे हे पूर्ण शेती आणि लाखोंचा खर्च मातीमोल झाला मात्र तयारी ही त्याने हार मानली नाही आणि आपलं संकल्प अविरत पार पाडत राहिला यामुळे जरूर गावातील सरपंचासह नागरिकांनी त्याचा कौतुक तर केलंच आहे मात्र त्याला जलदूत अशी उपाधी देखील दिली आहे.

    खरंतर पाणी वाटपासाठी घेतलेला बोर आजही चालतोय आणि त्यासोबत अजून एक बोर गावकऱ्यांसाठी आणि पंचक्रोशीतील येणाऱ्या नागरिकांसाठी त्यांनी घेतला आहे. मात्र यामध्ये कोणाचीही आर्थिक मदत न घेता हा त्याचा संकल्प राजेशने पूर्ण करून दाखवला आहे. गेल्या उन्हाळ्यापासून ते या उन्हाळ्यापर्यंत या बोरमुळे गावकऱ्यांसह अनेक परिसरातील नागरिकांना साथ दिली आहे” जो लोकांसाठी करतो त्याला देव साथ देतो “ही म्हण खोटी नाही हे राजेश कडून पाहून कळतं. अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed