• Fri. Mar 13th, 2026

    लग्नसराईत दागिन्यांवर डोळा; सोनसाखळीचोरांनी काढले डोके वर, दोन कारवायांत पाच जणांची धरपकड

    लग्नसराईत दागिन्यांवर डोळा; सोनसाखळीचोरांनी काढले डोके वर, दोन कारवायांत पाच जणांची धरपकड

    Mumbai Crime: मुंबईत सगळीकडे सीसीटीव्हींचे जाळे आहे, पोलिसही चोरांच्या मुसक्या आवळत आहेत. परंत सर्वसामान्यांनीही सावध राहण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    chain snatching

    मुंबई : सध्या लग्नसराई सुरू असून सगळीकडे दागिने घातलेली मंडळी नटूनथटून लगबगीने जाताना दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सोनसाखळीचोरांनी डोके वर काढले आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत सोनसाखळीचोरीचे २४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर, दुसरीकडे दोन दिवसांत पोलिसांनी पाच सोनसाखळीचोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईत सगळीकडे सीसीटीव्हींचे जाळे आहे, पोलिसही चोरांच्या मुसक्या आवळत आहेत. परंत सर्वसामान्यांनीही सावध राहण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

    पवईत २० मिनिटांत दोन चोऱ्या

    पवईमध्ये ५ एप्रिल रोजी २० मिनिटांत सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या. एका घटनेत दुचाकीवरील दोघांनी एका महिलेला ‘मेडिकल कुठे आहे?’, असे विचारले आणि महिलेच्या चेहऱ्यावर कपडा फेकून तिच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून पसार झाले. दुसऱ्या घटनेत हिरानंदानी गार्डन परिसरात ४५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दोन हार हिसकावले. २० मिनिटांत दोन घटना घडल्याने याची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश आव्हाड यांच्या पथकाने १००हून अधिक सीसीटीव्हींची पडताळणी करून पप्पू मिश्रा आणि सुनील महतो या दोघांना अटक केली.
    महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी सक्तीची, सरकारी निर्णयावरुन वादंग, मात्र फडणवीसांनी सांगितलं कारण
    ‘मॉर्निंग वॉक’ दरम्यान लूट
    सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडवर सकाळी चालत असताना वॅगन आर गाडीमधून आलेले तिघे गळ्यातील सोन्याची साखळी घेऊन पसार झाले. याबाबत गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकनगर पोलिसांच्या पथकाने अंधेरी येथे पाठलाग करून मेहसाद खान उर्फ सोनू, समीर शेख आणि नसीब अहमद यांना अटक करून त्यांच्याकडून चोरलेली साखळी जप्त केली.
    प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! १५ मेपर्यंत ‘या’ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटविक्री बंद, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
    प्रभावी कारवाईची गरज

    पोलिसांनी सोनसाखळीचोरीचे गुन्हे जबरी चोरीच्या कलमांखाली दाखल करण्यास सुरुवात केली होती. अनेक गुन्ह्यांत आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे जास्तीत जास्त दिवस आरोपी तुरुंगात राहिल्याने गुन्हे नियंत्रणात आले होते. आता तशाच प्रभावी कारवाईची आवश्यकता आहे.
    Credit Card Fraud: आसाममध्येही ‘जामतारा पॅटर्न’! क्रेडिट कार्डद्वारे बँकेला कोट्यवधींचा गंडा, पाच जणांना अटक
    अशी घ्या खबरदारी

    • अनोळखी व्यक्तीसोबत बोलणे टाळा
    • मदत मागणाऱ्यांशी थोडक्यात बोला
    • काहीही झाले तरी अंगावरील दागिने काढू नका
    • अंगावरील दागिन्यांचे प्रदर्शन करणे टाळा
    • महिला, वृद्धांनी एकटे फिरताना दागिने घालू नये
    • लूट झाल्याचे कळताच स्थानिकांची मदत घ्या


    साखळीचोरीचे गुन्हे वर्ष गुन्हे उकल

    • २०२५ —२१ —१६
    • २०२४ —११६ —१०४
    • २०२३ —११६ —१११
    • २०२२ —१९० —१५८
    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *