• Mon. Mar 9th, 2026

    नातेवाईकांचे टोमणे ऐकून आई वडिलांनी तीन महिन्यांच्या चिमुकल्या जीवाला फेकले विहिरीत

    नातेवाईकांचे टोमणे ऐकून आई वडिलांनी तीन महिन्यांच्या चिमुकल्या जीवाला फेकले विहिरीत

    Jalna News : जालन्याच्या बदनापूरमध्ये एका विहिरीत तीन महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलग चौथ्यांदा मुलगीच झाल्याने निराश झालेल्या जन्मदात्या आई-वडिलांनीच तिला विहिरीत फेकून तिची हत्या केली.

    महाराष्ट्र टाइम्स

    म.टा. प्रतिनिधी जालना : बदनापूर तालुक्यातील असरखेडा गावाच्या शिवारातील एका विहिरीत १२ एप्रिल रोजी एका तीन महिन्यांच्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हलविली होती.

    पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती पुढे

    अनैतिक संबंधातून मुलगी जन्मल्यामुळे खून झाला की अन्य काही कारणामुळे अशा सर्व चर्चा आणि शक्यतांची पडताळणी करून पोलिसांनी जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत जन्मलेल्या सर्व मुलींचा आणि त्यांच्या माता-पित्यांची माहिती जमविण्यास सुरुवात केली. पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात तपास पथकात कार्यरत असलेले पोलिस हवालदार जितेंद्र तागवाले हे असरखेडा परिसरातील गावे, तांडे, वाड्यांमध्ये जन्मलेल्या बालकांची माहिती काढण्यात आली.
    Ranjit Kasle: कराडच्या एन्काऊंटरसाठी मला ५० कोटींची ऑफर! सनसनाटी दावा करणारे रणजीत कासले कोण?चौथ्यांदा मुलगी झाल्याने नातेवाइकांनी केले अपमानित

    यादरम्यान पोलिसांच्या हाती महत्वाची धागेदोरे लागली. चौथ्यांदा मुलगीच झाल्यामुळे पवार दाम्पत्याला काही जवळचे नातेवाइक अपमानित करीत असल्याचे पोलिसांना समजते. यानंतर पोलिसांनी याबद्दलची चाैकशी केली. लोकांमधील चर्चेतून याबद्दल पोलिसांना माहिती लागली. पोलिसांनी या चिमुकलीच्या खुनाचा शोध लावला. ज्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली आणि सर्वांनाच मोठा धक्का लागला. जन्मदात्यांनीच त्या कवळ्या जीवाला संपवले.

    माता-पित्यांनीच तीन महिन्यांच्या चिमुकल्या जीवाला फेकले विहिरीत

    सलग चौथ्यांदा मुलगी झाल्यामुळे जन्मदात्या माता-पित्यांनीच तीन महिन्यांच्या चिमुकल्या जीवाला विहिरीत फेकून दिले. आई वडिलांनी देखील आपला गुन्हा कबूल केलाय. पवार दाम्पत्याला तीन मुली होत्या आणि चाैथी देखील मुलगीच झाल्याने ते निराश झाले. शेवटी त्यांनी तीन महिन्याच्या कवळ्य जीवाला थेट विहिरीत फेकून दिले. गावात या घटनेची माहिती मिळताच मोठी खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांनी अखेर याप्रकरणात मोठा खुलासा केला असून आई वडिलांनीच मुलीला विहिरीत फेकल्याचे स्पष्ट केले.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed