• Wed. Apr 23rd, 2025 6:47:24 PM

    महामुंबईसाठी भंगार वाहन विल्हेवाट सुविधा; पनवेल, कर्जतमध्ये केंद्रांची उभारणी, परिवहन विभागाचा निर्णय

    महामुंबईसाठी भंगार वाहन विल्हेवाट सुविधा; पनवेल, कर्जतमध्ये केंद्रांची उभारणी, परिवहन विभागाचा निर्णय

    Mumbai News: महामुंबईकरांना आता अधिकृत भंगार वाहन विल्हेवाट सुविधा उपलब्ध होणार आहे. परिवहन विभागाने पनवेल आणि कर्जतमध्ये अशी केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

    हायलाइट्स:

    • जुलै महिन्यापर्यंत दोन्ही केंद्रे होणार सुरू
    • वाहनचालकांना मिळणार बाजारभावापेक्षा चांगली किंमत
    • विल्हेवाटीनंतर नव्या वाहनासाठी १५ टक्के करसवलत
    महाराष्ट्र टाइम्स
    scarp

    मुंबई : आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्या भंगारात काढण्यासाठी महामुंबईकरांना आता अधिकृत भंगार वाहन विल्हेवाट सुविधा उपलब्ध होणार आहे. परिवहन विभागाने पनवेल आणि कर्जतमध्ये अशी केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यांमध्ये वाहन मोडीत काढल्यास संबंधितांना वाहनाची योग्य किंमत आणि नवीन वाहन खरेदीसाठी करांमध्ये १५ टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ मिळणार आहे.प्रदूषणकारी जुनी वाहने हद्दपार करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भंगार वाहन विल्हेवाट धोरण जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार वाहनधारकांना आपले जुने वाहन सहज मोडीत काढता यावे, यासाठी सर्व राज्यांमध्ये योग्य ठिकाणी विल्हेवाट केंद्र उभारण्याची सूचना केंद्राकडून करण्यात आली आहे. याअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वेच्छेने वाहन मोडीत काढणाऱ्यांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना १५ टक्के करसवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
    ‘अ‍ॅम्बी व्हॅली’वर ईडीकडून टाच; सहारा समुहाच्या लोणावळ्याजवळील ७०७ एकर जमिनीवर कायदेशीर कारवाई
    वार्षिक कर लागू असलेल्या वाहनांना वाहन नोंदणीच्या तारखेपासून पुढील आठ वर्षांपर्यंत, तर परिवहनेतर प्रकारातील वाहनांसाठी १५ वर्षांपर्यंत १५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. नोंदणीकृत केंद्रावर वाहन मोडीत काढल्यानंतर वाहनधारकास मिळालेले ठेव प्रमाणपत्र करसवलतीसाठी पुढील दोन वर्षे वैध राहणार आहे. दुचाकी, तीन चाकी किंवा हलके वाहन मोडीत काढलेले असेल, तर त्याच प्रकारचे वाहन खरेदी केल्यानंतर त्याची नोंदणी करताना करसवलत लागू होणार आहे. मुंबईत केंद्र नसल्याने मुंबईकरांना मात्र आयुर्मान पूर्ण झालेल्या आपल्या गाड्या पनवेल, कर्जतमध्ये घेऊन जाव्या लागणार आहेत.

    ‘राज्यात पुणे, नागपूर, जालना, रायगड आणि नाशिक या ठिकाणी भंगार वाहन विल्हेवाट केंद्रे सुरू झाली आहेत. आणखी सात ठिकाणी अशी केंद्रे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी लवकरच जागा निश्चित करण्यात येतील’, असे परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने स्पष्ट केले.
    Sanjay Raut: ‘तो’ आका मंत्रिमंडळात! सिंधुदुर्ग हत्याकांडप्रकरणी खासदार संजय राऊत यांचा आरोप
    विल्हेवाट केंद्रामुळे असाही फायदा…
    ■ जुन्या वाहनांचा वाहन क्रमांक नव्या वाहनाला कायम ठेवण्याची सुविधा
    ■ वाहने केंद्रामध्ये जमा केल्याने त्यांचा देशविघातक कृत्यासाठी वापर होण्याची भीती नाही
    ■ केंद्रात यांत्रिक पद्धतीने निष्कासन होत असल्याने टायर, काच, प्लास्टिक, इंजिन यांचा पुनर्वापर शक्य
    शकुंतला खटावकर यांना ‘जीवनगौरव’! शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, राज्यातील ‘या’ ८९ खेळाडूंचा होणार सन्मान
    प्रामुख्याने आयुर्मान पूर्ण झालेल्या जुन्या वा वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पनवेल व कर्जत येथे भंगार वाहन विल्हेवाट केंद्रे उभारली जात आहेत. त्यांचे काम सुरू असून, जुलैपर्यंत ती पूर्ण होतील. त्यानंतर वाहनधारकांना इथे आपली वाहने मोडीत काढता येतील.- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed