Mumbai News: महामुंबईकरांना आता अधिकृत भंगार वाहन विल्हेवाट सुविधा उपलब्ध होणार आहे. परिवहन विभागाने पनवेल आणि कर्जतमध्ये अशी केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
हायलाइट्स:
- जुलै महिन्यापर्यंत दोन्ही केंद्रे होणार सुरू
- वाहनचालकांना मिळणार बाजारभावापेक्षा चांगली किंमत
- विल्हेवाटीनंतर नव्या वाहनासाठी १५ टक्के करसवलत

वार्षिक कर लागू असलेल्या वाहनांना वाहन नोंदणीच्या तारखेपासून पुढील आठ वर्षांपर्यंत, तर परिवहनेतर प्रकारातील वाहनांसाठी १५ वर्षांपर्यंत १५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. नोंदणीकृत केंद्रावर वाहन मोडीत काढल्यानंतर वाहनधारकास मिळालेले ठेव प्रमाणपत्र करसवलतीसाठी पुढील दोन वर्षे वैध राहणार आहे. दुचाकी, तीन चाकी किंवा हलके वाहन मोडीत काढलेले असेल, तर त्याच प्रकारचे वाहन खरेदी केल्यानंतर त्याची नोंदणी करताना करसवलत लागू होणार आहे. मुंबईत केंद्र नसल्याने मुंबईकरांना मात्र आयुर्मान पूर्ण झालेल्या आपल्या गाड्या पनवेल, कर्जतमध्ये घेऊन जाव्या लागणार आहेत.
‘राज्यात पुणे, नागपूर, जालना, रायगड आणि नाशिक या ठिकाणी भंगार वाहन विल्हेवाट केंद्रे सुरू झाली आहेत. आणखी सात ठिकाणी अशी केंद्रे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी लवकरच जागा निश्चित करण्यात येतील’, असे परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने स्पष्ट केले. Sanjay Raut: ‘तो’ आका मंत्रिमंडळात! सिंधुदुर्ग हत्याकांडप्रकरणी खासदार संजय राऊत यांचा आरोप
विल्हेवाट केंद्रामुळे असाही फायदा…
■ जुन्या वाहनांचा वाहन क्रमांक नव्या वाहनाला कायम ठेवण्याची सुविधा
■ वाहने केंद्रामध्ये जमा केल्याने त्यांचा देशविघातक कृत्यासाठी वापर होण्याची भीती नाही
■ केंद्रात यांत्रिक पद्धतीने निष्कासन होत असल्याने टायर, काच, प्लास्टिक, इंजिन यांचा पुनर्वापर शक्यशकुंतला खटावकर यांना ‘जीवनगौरव’! शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, राज्यातील ‘या’ ८९ खेळाडूंचा होणार सन्मान
प्रामुख्याने आयुर्मान पूर्ण झालेल्या जुन्या वा वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पनवेल व कर्जत येथे भंगार वाहन विल्हेवाट केंद्रे उभारली जात आहेत. त्यांचे काम सुरू असून, जुलैपर्यंत ती पूर्ण होतील. त्यानंतर वाहनधारकांना इथे आपली वाहने मोडीत काढता येतील.- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त