• Mon. Apr 14th, 2025 12:53:32 PM

    Success Story : इंजिनिअर तरुणाने नोकरी सोडली, शेतात रमला, आज कमावतोय लाखो पैसे

    Success Story : इंजिनिअर तरुणाने नोकरी सोडली, शेतात रमला, आज कमावतोय लाखो पैसे

    Authored byचेतन पाटील | Contributed by मोबिन खान | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Apr 2025, 8:27 pm

    Pratik Dhumal Success Story : प्रतीक २०२१ मध्ये आपली नोकरी सोडून पुण्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावात आपल्या गावी परतला. कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात त्यांचं चार एकर क्षेत्र आहे. प्रतिकने तेथे वैदिक शेतीला सुरुवात केली. आज तो यशस्वी शेतकरी झाला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मोबीन खान, नगर (कोपरगाव) : ऑटोमोबाईल क्षेत्रात उज्ज्वल करिअर असलेल्या एका तरुणाने शहरातील चकाकीला बाजूला सारत शेतीचा मार्ग स्वीकारला आणि आज तो वर्षाकाठी लाखो रुपयांचा टर्नओव्हर असलेला यशस्वी युवा शेतकरी ठरला आहे. ही प्रेरणादायी कहाणी आहे, प्रतीक धुमाळ या युवा शेतकऱ्याची. प्रतीक एकेकाळी ऑटोमोबाईल क्षेत्रातील एका नामांकित कंपनीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होता. मात्र शहरात रासायनिक खतांचं वापर करून पिकवलेले पालेभाज्या आणि फळ पाहून प्रतीकने वैदिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेऊन गावी परतला आणि वैदिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला. त्याला त्याचा सहकारी ज्ञानेश्वर बाचकर या पदवीचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने देखील मोलाची साथ दिली.

    प्रतीक २०२१ मध्ये आपली नोकरी सोडून पुण्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावात आपल्या गावी परतला. कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात त्यांचं चार एकर क्षेत्र आहे. प्रतिकने तेथे वैदिक शेतीला सुरुवात केली. त्यांनी रासायनिक खतांपासून पूर्णतः मुक्त अशी शेती पद्धत स्वीकारली आणि सुरुवातीला काही अडचणींचा सामना केला. मात्र, चिकाटी आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर यामुळे त्यांना उत्तम यश मिळू लागले.

    प्रतीकने गेल्या चार वर्षांत आपल्या कुटुंबातील सदस्य आणि सहकाऱ्यांच्या मदतीने चार एकर शेतीत वैदिक पद्धतीने विविध उत्पादन घेऊन वर्षाकाठी 4 ते 5 लाखांचे उत्पन्न मिळवले. आता त्याने टरबुज आणि खरबूज या फळ पिकाचं उत्पादन घेतलं असून थेट बाजारात विक्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    Tanisha Bhise Case : ‘धमक्यांचे फोन, भीती वाटते, रात्री झोपू शकत नाही’, डॉ. घैसास राजीनाम्यात काय-काय म्हणाले?
    प्रतीक यांची ही कहाणी तरुणांना शेतीकडे वळण्यासाठी नवी दिशा दाखवते. हल्ली तरुणांमध्ये नोकरीची क्रेझ आहे. अनेक जण शहराकडे वळताना दिसत आहे. स्मार्ट लाईफस्टाईलच्या चक्करमध्ये स्वतःची शेती उद्ध्वस्त होत असल्याचे अनेक उदाहरण आहे. मात्र प्रतीक याला अपवाद ठरत त्याने नोकरी करण्याचा निर्णय बदलून आपल्या स्वतःच्या हक्काच्या शेतीकडे वळला. तरुण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी शेती देखील करीत आहे आणि त्यातून वर्षकाठी लाखोंचा उत्पन्न कमवत आहे. प्रतीकने आपल्या शेतीत यशस्वी प्रयोग करून इतर तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला हे मात्र नक्की.
    Prashant Koratkar : असीम सरोदेंच्या दाव्यावर कोरोटकरच्या वकिलांचा आक्षेप, वकिलांमध्ये खडाजंगी, वाचा A टू Z युक्तिवाद

    वैदिक शेती म्हणजे काय?

    हल्ली पिकांवर रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून त्याचे दुष्परिणाम नागरिकांना जाणवत आहे. त्यामुळे अनेक जण जैविक किंवा सेंद्रीय शेतीकडे वळत असून जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी अनेक शेतकरी आता वैदिक शेती करीत आहे. वैदिक शेतीमध्ये वैदिक खतांचा वापर होतो. वैदिक खतामध्ये गोमूत्र, जनावरांचं मलमूत्र, सोबत तंबाकू डस्ट, निंबोळी पेंढ, कोंबडी खत, बोनमिळा, तांदळ तूस, प्रेसमड आदींसह काही वनस्पतींच्या आधारे खत तयार करून याचा शेतीसाठी वापर केला जातो.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed