Raigad School Student Suspicious Death : रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या माणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे
Raigad जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या माणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. गर्वांग दिनेश गायकर असं १४ वर्षीय मयत मुलाचं नाव आहे. आपल्या लेकाचा नाहक बळी गेला असल्याचा आरोप गर्वांगच्या नातेवाईकांसह घूम ग्रामस्थांनी केला आहे.
म्हसळा तालुक्यातील घूम गावात राहणाऱ्या गर्वांग दिनेश गायकर याच्या पायावर केस पुळी आली. त्याला शुक्रवारी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रात्री १०:३० वाजताच्या सुमारास पुन्हा म्हसळा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.
गर्वांग याला ताप जास्त प्रमाणात असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्वांगला त्याच वेळी रात्री १ वाजे पर्यंत माणगाव रुग्णालयात उपचारासाठी नेले.Pune Crime : शिवीगाळ केल्याचा राग, पुण्यात रुममेटवर जीवघेणा हल्ला, अर्जुनच्या अंगावर महेश धावून गेला अन्…
माणगाव येथील कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी यांनी गर्वांग दिनेश गायकर याला नुसतीच बारीकशी केसपुळी झाली आहे. यावेळी ताप येतो, एवढ्या छोट्या गोष्टीचा गाजावाजा करत १०८ ची रुग्णवाहिका मोफत भेटते म्हणून कशाला आणायची? म्हसळच्या डॉक्टरांना काही समजत नाही का? असे बोलून उपचार न करता त्याला घरी पाठवले, असे गर्वांगच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.
रविवारी दिनांक ६ एप्रिल रोजी पहाटे ८ वाजता गर्वांग घरी पोहचताच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टरांनी गर्वांगला उपचारासाठी ठेवले असते, तर तो सर्वांसोबत असता अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. गर्वांगवर उपचार न करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.Nagpur Accident : भरधाव टिप्परची धडक, कार पानठेल्यात घुसून चक्काचूर, गॅरेज संचालकाचा चिरडून अंत
म्हसळा तालुक्यात परिपूर्ण उपचार मिळत नाही, हे तालुक्यातील जनतेला मिळालेला शाप आहे. हा प्रकार पहिल्यांदाच घडला नसून अनेक प्रकार तालुक्यात घडलेले आहेत आणि घडत आहेत. केवळ इमारती सुसज्ज बांधून त्याच्यात उपचार होत नसतील, तर त्या इमारतीला करायचं काय? केवळ शोबाजी करून आरोग्य सेवेच्या नावावर राजकारण करीत असतील, तर अशा राजकारणांना कराव काय? असे एक ना अनेक प्रश्न तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहेत.