• Tue. Apr 22nd, 2025 11:41:43 AM

    ‘भारतकुमार’ यांना अखेरचा दंडवत!- सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 4, 2025
    ‘भारतकुमार’ यांना अखेरचा दंडवत!- सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार – महासंवाद




    मुंबई, दि. ४ : हिंदी चित्रपट सृष्टीचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक आणि प्रतिभावंत अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे.

    शहीद, उपकार, पूरब और पश्चिम, रोटी, कपडा और मकान आणि क्रांति यांसारख्या अजरामर चित्रपटांद्वारे देशभक्तीचा जाज्वल्य अभिमान त्यांनी जपला आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राष्ट्रप्रेम जागवलं. देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मनोज कुमार यांना ‘भारतकुमार’ या नावाने ओळखले जात असे. त्यांचे सिनेमे, त्यांची गाणी आणि त्यांचे विचार सदैव आपल्यासोबत राहतील.

    त्यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
    000







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed