Obesity Nutrition Survey Maharashtra : राज्यात पोषण आहार कार्यक्रमातील सर्व्हेमध्ये लहान मुलांमधील स्थूलतेबाबत सांगण्यात आलं आहे. याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधलं आहे.
मुलांमधील लठ्ठपणाचे प्रमाण पुणे शहरात सात टक्के, मुंबई शहरात आठ टक्के, तर मुंबई उपनगरांत सात टक्के आहे. शून्य ते पाच वर्षे वयोगटामध्ये कुपोषणग्रस्त आदिवासी, ग्रामीण भागामध्येही स्थूलता वाढत असल्याचे दिसत आहे.
मुंबई उपनगरामध्ये दोन लाख ३४ हजार ८९६ मुलांची स्थूलतेसंदर्भात चाचणी करण्यात आली. त्यामध्ये सात टक्के मुले स्थूल आढळली. मुंबई शहरातील ४८ हजार २४१ मुलांपैकी आठ टक्के, ठाण्यात एक लाख ८५ हजार ३६० मुलांमधील सहा टक्के, तर पुण्यात दोन लाख ९८ हजार ९२९ मुलांपैकी सात टक्के मुले स्थूल असल्याचे दिसून आले.
Weather Forecast : राज्यासाठी यंदाचा उन्हाळा ठरणार तापदायक, उष्मालाटांचे दिवस अधिक; एप्रिल ते जून कसं असणार हवामान?
नंदुरबार, गडचिरोली, पालघर, वाशिम या आदिवासी भागामध्ये कुपोषणासह अतिपोषण झालेल्या मुलांची संख्या मोठी असल्याचे दिसते. गडचिरोलीमध्ये ६९ हजार ६९१ मुलांमधील सात टक्के, तर नंदुरबारमधील एक लाख १९ हजार ६८३ मुलांमध्ये सात टक्के मुले स्थूल आहेत. त्यामुळे पोषण आहाराचा मुलांना किती लाभ होतो, याचेही विश्लेषण गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे.
लठ्ठपणा वाढतोय –
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार (एनएफएचएस ५) पाच वर्षांखालील भारतीय मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. २०१९-२१ मध्ये पाच वर्षांखालील ३.४ टक्के मुलांमध्ये स्थूलतेची समस्या दिसून आली. २०१५-१६ मध्ये हे प्रमाण २.१ टक्के होते.
Gold Rate : सोन्याने मोडला मागील १२ वर्षांचा रेकॉर्ड, भाव सतत वाढतोय; कितीपर्यंत पोहोचेल गोल्ड रेट?
सहव्याधींना निमंत्रण –
‘स्थूलतेमुळे केवळ मधुमेह नाही, तर इतर व्याधीही निर्माण होतात. सात ते १८ वर्षे या वयोगटामध्येही टाइप-टू मधुमेह हा प्रामुख्याने स्थूलतेमुळे वाढत असल्याचे दिसते. त्यामुळे योग्यवेळी लक्षणे समजून घेत निदान आणि उपचारावर भर द्यावा,’ याकडे केईएम रुग्णालयाचे मधुमेहतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश शिवणे यांनी लक्ष वेधले. आनुवांशिकता, पालकांमधील लठ्ठपणा या कारणांचाही विचार करण्याची गरज बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप केळकर यांनी व्यक्त केली.
Obesity in Children : बीडची इथेही सरशी, स्थूलत्वाचं प्रमाण सर्वाधिक, कारण काय? सर्व्हेमध्ये मोठी माहिती
योग्य आहारसवयींकडे हवे लक्ष –
लठ्ठपणा हा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम करतो. नैराश्यग्रस्त स्थितीमध्ये मुले अति खातात किंवा खाणे सोडतात. मुलांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी तयार होत असतानाच, पोषक आहारासंदर्भातील सवयी जाणीवपूर्वक तयार व्हाव्यात, यासाठी पालकांनी आग्रही राहावे, असे समुपदेशक वाय. पी. साळवी यांनी नमूद केले.
जिल्हावार स्थूलतेची टक्केवारी –
लातूर ७, भंडारा ५, बुलढाणा ७, चंद्रपूर ८, धाराशीव ६, धुळे ७, गडचिरोली ७, जळगाव ८, नाशिक ७, सांगली ६.

