मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या सभेत गंगा नदीच्या प्रदुषणाचे व्हिडीओ दाखवत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाकुंभमेळ्यातील स्नानाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादावरही स्पष्टीकरण दिलं.
“निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय झाले. अनेक विषय बोलले गेले. शुभेच्छांचे अनेक फोनही आले. नेमके आजच आले. आज का आले? याचे अर्थ मला समजतात. जरा जपून. पण गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या, मला असं वाटतं तुम्हाला काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे. त्यातला पहिला विषय म्हणजे कुंभमेळा. मी त्यादिवशी महटल्याप्रमाणे आमच्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं. मग मी त्यांना सांगितलं की, मी पिणार नाही. मग नव्याने वारं शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना वाटलं की मी कुंभमेळ्याचा अपमान केला. अरे काय मुर्ख आहात का?”, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
“आमचे नयन कदम तिकडे जावून आले. कसं वाटलं? म्हणे आतमध्ये गेल्यानंतर अहह… असं झालं म्हणे. अहह… नाही, खालून एखादं प्रेत गेलं असेल. आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे, ज्याला आपण माता म्हणतो, देवी म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचं लक्ष नाही. हे आज नाही, अनेक वर्षांपासूनचं आहे. मला अजूनही आठवतं, गंगा साफ करावी, असं बोलणारी पहिली व्यक्ती राजीव गांधी होते. राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरु केलं. तेव्हापासून गंगा साफ करत आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी 2014 ला पंतप्रधान झाले. त्यांनीही तेच सांगितलं की, गंगा साफ करणार”, असं राज ठाकरे म्हणाले.
“आपल्याकडच्या देशातील अशी अवस्था आहे त्याच्या पाणी पिणं लांबच आहे, तुम्ही अंघोळ केली. माझ्याकडे उत्तरातील काही लोक येऊन गेली. त्यांनी सांगितलं की, तिथे लाखो लोकं अंघोळ करुन गेली आणि आजारी पडले. प्रश्न हा गंगेचा आणि कुंभमेळ्याचा अपमानाचा नाही. पाण्याच्या स्थितीचा आहे. कशाप्रकारचं ते पाणी असतं, अजूनही त्या गोष्टी थांबल्या जात नाहीत. सहज मी मिनिटभराची गंगेची आताची परिस्थिती दाखवतो”, असं म्हणत राज ठाकरेंनी गंगा नदीचे व्हिडीओ दाखवले.
Manoj Jarange Patil : मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जरांगेंचा सरकारला थेट गावबंदीचा इशारा
“ही गंगेची परिस्थिती आहे. आतापर्यंत गंगा स्वच्छता करण्यात 33 हजार कोटी खर्च झाले. तुम्ही आता तो महंत बघितला, ज्याला बोटीतून तशाच्या तसा टाकून दिला. तिकडच्या घाटांवर प्रेतं टाकली जात आहेत. नुसतं अग्निदिल्यासारखं करतात आणि तसंच प्रेत पाण्यात ढकलून देतात. हा कोणता धर्म? आमच्या नैसर्गिक गोष्टींवर अशाप्रकारे धर्म अडवा येत असेल तर काय करायचं त्याचं? आपल्या गोष्टींमध्ये आपण सुधारणा करायला नको. हजार वर्षांपूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या. आता वेगळ्या आहेत. हेच विधी करण्यासाठी एका वेगळ्या घाटावर व्यवस्था करता येत नाही का?”, असे सवाल राज ठाकरे यांनी केले.

