• Fri. Mar 6th, 2026
    पाडव्याला कोकणात पावसाची शक्यता, चक्रिवादळाचा इशारा, मासेमारी नौका किनाऱ्यावर

    Ratnagiri Rain News : कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून चक्रिवादळाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या इशाऱ्यानंतर मासेमारी नौका किनाऱ्यावर उभ्या करण्यात आल्या आहेत.

    Lipi

    प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात अवेळी पावसाने आंबा, काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत. गेले चार ते पाच दिवसात कोकणात काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. पण या पावसाने आंबा, काजू बागायतदारांवर संकट ओढावलं आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशारामुळे समुद्रातील नौकाही सुरक्षित स्थळी उभ्या करण्यात आल्या आहेत. नौका समुद्रातून माघारी परतल्या आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळपासून ते महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवापालट होत आहे.

    हवामान विभागाचे तज्ज्ञ सुप्रित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या दोन दिवसांत दोन ते तीन डिग्री सेल्सियसने तापमानात घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दोन ठिकाणी ४२ ते ४४ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात ४० ते ४२ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कोकण पट्ट्यात दिवसा उष्ण, तर संध्याकाळी पावसाळी वातावरण होऊ लागले आहे. मिरकरवाडा, राजीवडा, मिऱ्या, साखरतर, जाकादेवी, कासारवेली, जयगड, नाटे, हर्णे येथील बहुतांश नौका सोसाट्याच्या वाऱ्याच्या भीतीने किनाऱ्यावर आल्या आहेत.
    Ratnagiri News : कोकणात अवकाळी पाऊस, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आंबा, काजू बागायतदार चिंतेत
    कर्नाटकच्या समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर २९ आणि ३० मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले असून, मच्छीमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर नांगरुन ठेवल्या आहेत. पुढचे दोन दिवस दिवसा तापमानात २ ते ३ डिग्री सेल्सियसने वाढ होऊ शकते. तर रात्री तापमान २ ते ३ डिग्री सेल्सियसने घसरण्याची शक्यता आहे. त्यानंतर तीन दिवस कोणताही बदल होणार नाही. मात्र मे आधीच उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. अवकाळी पाऊस आणि ऊन यामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. नागपूर, ब्रह्मपुरी, अकोला, वर्धा, अमरावतीमध्ये सर्वाधिक उच्च तापमानाची नोंद करण्यात आली. अनेक भागांमध्ये ४२ अंशांपेक्षा जास्त तापमान होतं.
    Sangli News : सांगली जिल्ह्याला अवकाळीने झोडपले; वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, रब्बीला पिकाला फटका

    Ratnagiri News : कोकणात यलो अलर्ट; २९ – ३० मार्चला पावसाची शक्यता, चक्रिवादळाचा इशारा, मासेमारी नौका किनाऱ्यावर

    यावर्षी आधीच २५ ते ३० टक्के इतकंच आंबा उत्पादन आहे. त्यातच थ्रीप्स, तुडतुडा, फळमाशीचे संकट ओढावलं आहे. आधीच दुष्टचक्रात आंबा सापडलेला असताना, पावसाच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. पावसामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असल्याने मासेमारी नौका किनारपट्टीवर उभ्या ठेवण्यात आलेल्या आहेत.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed